शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

स्रियांनी स्वतःला व्यक्त करण्याची गरज  :  डॉ. विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:05 IST

शारदा प्रकाशन आयोजित  सोहळ्याला डॉ. विजया वाड उपस्थित होत्या. 

ठळक मुद्देस्रियांनी स्वतःला व्यक्त करण्याची गरज  :  डॉ. विजया वाडडॉ. विजया वाड यांच्या हस्ते चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न आजची स्त्री ही माघार घेतांना दिसत नाही : डॉ. शारदा निवाते

ठाणे : " एकविसाव्या शतकातही  पुरुषप्रधान संस्कृतीने स्वतःची पकड़ ढिली होऊ दिलेली नाही . आजही अनेक स्रियांचे चूल ,मूल आणि संसाराचा गाड़ा हाकण्यात  उभे आयुष्य  खर्ची पड़त आहे . या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून स्रियांनी जिथे जसे जमेल तसे स्वतःला व्यक्त करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा ,सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले .

शारदा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या .  मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथील सोहळ्यात कवयित्री प्रज्ञा पंडित यांचे 'व्यक्त अव्यक्त ' आणि 'काव्य लिपी' हे काव्यसंग्रह, कवी चारुदत्त मुंढे यांचा 'इंद्रधनुष्य' हा काव्यसंग्रह आणि लेखिका शकुंतला चौधरी लिखित 'आली वादळे तरीही' या कादंबरीचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लेखिका डॉ. शारदा निवाते या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे निवेदन कवी मनिष पंडित ह्यांनी केले. याप्रसंगी बोलतांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शारदा निवाते म्हणाल्या की, आजची स्त्री ही माघार घेतांना दिसत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर, समाजातल्या रूढी-परंपरांवर ती व्यक्त होते आणि गरज पडल्यास लढतेही ही खरंच स्वागतार्ह गोष्ट आहे.  कवीला कोणताही विषय वर्ज्य वाटत नाही किंबहूना आजूबाजूला घडणारी प्रत्येक संवेदनशील घटना कवीच्या जीवाला चटका लावून जाते आणि त्यातूनच कविता जन्माला येते असं ही त्या म्हणाल्या.  तीनही लेखकांच्या लिखाणाचं कौतुक करतांना त्या म्हणाल्या की हे लिखाण कुठल्याही महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावं इतकं प्रभावी आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचलं पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड ह्यावेळी बोलतांना म्हणाल्या की आज प्रत्येकानं 'व्यक्त होणं' फार गरजेचं आहे.  अव्यक्त राहून आपण मनात बऱ्याच आढ्या घेऊन जगतो आणि त्याचा आपल्याच त्रास होतो. ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज असून त्यामुळे जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं लिखाण पोहोचवता येतं तेव्हा आजच्या प्रकाशन संस्थांनीही त्याकडे सकारात्मकपणे पहावं असंही त्या म्हणाल्या.  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिकांचंही त्यांनी मनापासून कौतुक केलं. ह्या वेळी मनोगत मांडतांना प्रज्ञा पंडित यांनी त्यांच्यातील कवी, साहित्यिक कसा आकारास आला हे सांगत त्याचे सर्व श्रेय त्यांच्या वडिलांना दिले. शारदा प्रकाशनच्या संतोष राणे सरांच्या मार्गदर्शनामुळेच माझी पुस्तके आज प्रत्यक्षात उतरली आहेत हे असं ही त्या म्हणाल्या.  कवी चारुदत्त मुंढे ह्यांनी आपल्या मनोगतात मोबाईल वापराच्या अतिरेकाबद्दल खंत व्यक्त केली. फक्त वाचाल तर वाचाल असे न म्हणता 'पुस्तके वाचाल तरच वाचाल' असं म्हणण्याची वेळ आली आहे असं ही ते म्हणाले.  आपल्या भाषणात लेखिका शकुंतला चौधरी ह्यांनी लहानपणी झालेल्या कीर्तन संस्कारांचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि लिखाणावर आहे असं सांगितलं. आजवर वाचकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केलं. चांगली प्रकाशन संस्था पाठीशी असल्यानेच आपण वाचकांपर्यंत पोहोचू शकलो असं ही त्या म्हणाल्या.  या सोहळ्यात कवी समाधान मोरे यांना 'विश्वविजय' या काव्यसंग्रहासाठी आणि कवी नवनाथ रणखांबे यांना 'जीवनसंघर्ष' या काव्यसंग्रहासाठी 'साहित्यसेवा' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि ‌ तेजस्वी अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभही या सोहळ्यात पार पडला.  ह्या वेळी कवी  काळूदास कनोजे आणि सचिन गुप्ता हे  उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले तर कवयित्री कवयित्री सुलभा वासुदेव ढोके-जुवाटकर, शिल्पा नायर आणि किशोरी शंकर पाटील ह्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली.   रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे सोहळ्याची रंगत वाढली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक