शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पाण्यासाठी श्रमजीवीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 04:50 IST

ठामपा अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द : घोडबंदर येथील गावपाडे, आदिवासी वस्त्यांत भीषण टंचाई

ठाणे : घोडबंदर भागाचा झपाट्याने विकास होत असताना येथील गावपाड्यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. या भागातील गावपाडे आणि आदिवासी वस्त्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिला रिकामे हंडे-मडके घेऊन सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी महापालिका अधिकाºयांना सुपूर्द केले.

ठाणे महापालिकेची निवड स्मार्ट सिटीच्या यादीत झाली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेपासून ठाण्यात अस्तित्वात असलेले मूळ ठाणेकर नागरिक अद्यापही पाण्यासारख्या मूलभूत सोयींपासून वंचित आहेत. ठाण्यातील समतानगर, पातलीपाडा, इंद्रापाडा, डोंगरीपाडा, बोरिवडे, भार्इंदरपाडा, वळकरीपाडा, ओवळा-टकरडा, पानखंडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोकणीपाडा आदी आदिवासीपाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, येथील कुटुंबांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी शेकडो आदिवासी महिला डोईवर हंडे-कळशा आणि रिकामे मडके घेऊन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पर्यायी पाणीव्यवस्थेसह वैयक्तिक नळजोडणी करून देण्याची आणि शौचालय, स्मशानभूमी, वनहक्क दावे आणि इतर मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याबाबत पालिका अधिकाºयांना मोर्चेकºयांनी निवेदन दिले. आदिवासीपाड्यांतील पाच ते सात ठिकाणांवर पाणीटंचाई असल्याचे मोर्चेकºयांचे म्हणणे आहे. समतानगर, पातलीपाडा येथे पाणी आहे. मात्र, काहीजण पंप लावून पाणी खेचत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन टंचाई निर्माण होत आहे.पाण्यासाठी दाही दिशायाचे सर्वेक्षण करण्याबरोबरच वितरणव्यवस्थेसह नवीन पाण्याची टाकी आणि पंपदेखील बसवले जाईल. पानखंडा भागात नियमित टँकरची सुविधा पुरवली जाते. शिवाय, कूपनलिकाही आहेत. तरीही, काही समस्या असतील तर, त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिले. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, पाण्यासाठी त्यांना दाही दिशा फिरावे लागते आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका