शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पाण्यासाठी श्रमजीवीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 04:50 IST

ठामपा अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द : घोडबंदर येथील गावपाडे, आदिवासी वस्त्यांत भीषण टंचाई

ठाणे : घोडबंदर भागाचा झपाट्याने विकास होत असताना येथील गावपाड्यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. या भागातील गावपाडे आणि आदिवासी वस्त्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिला रिकामे हंडे-मडके घेऊन सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी महापालिका अधिकाºयांना सुपूर्द केले.

ठाणे महापालिकेची निवड स्मार्ट सिटीच्या यादीत झाली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेपासून ठाण्यात अस्तित्वात असलेले मूळ ठाणेकर नागरिक अद्यापही पाण्यासारख्या मूलभूत सोयींपासून वंचित आहेत. ठाण्यातील समतानगर, पातलीपाडा, इंद्रापाडा, डोंगरीपाडा, बोरिवडे, भार्इंदरपाडा, वळकरीपाडा, ओवळा-टकरडा, पानखंडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोकणीपाडा आदी आदिवासीपाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, येथील कुटुंबांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी शेकडो आदिवासी महिला डोईवर हंडे-कळशा आणि रिकामे मडके घेऊन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पर्यायी पाणीव्यवस्थेसह वैयक्तिक नळजोडणी करून देण्याची आणि शौचालय, स्मशानभूमी, वनहक्क दावे आणि इतर मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याबाबत पालिका अधिकाºयांना मोर्चेकºयांनी निवेदन दिले. आदिवासीपाड्यांतील पाच ते सात ठिकाणांवर पाणीटंचाई असल्याचे मोर्चेकºयांचे म्हणणे आहे. समतानगर, पातलीपाडा येथे पाणी आहे. मात्र, काहीजण पंप लावून पाणी खेचत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन टंचाई निर्माण होत आहे.पाण्यासाठी दाही दिशायाचे सर्वेक्षण करण्याबरोबरच वितरणव्यवस्थेसह नवीन पाण्याची टाकी आणि पंपदेखील बसवले जाईल. पानखंडा भागात नियमित टँकरची सुविधा पुरवली जाते. शिवाय, कूपनलिकाही आहेत. तरीही, काही समस्या असतील तर, त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिले. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, पाण्यासाठी त्यांना दाही दिशा फिरावे लागते आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका