शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

दुभाजकाला रिक्षा धडकून महिलेचा जळून मृत्यू, अपघातानंतर लागली आग; रिक्षाचालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 08:05 IST

रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने  ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता.

ठाणे - रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातानंतर रिक्षाने अचानक पेट घेतला. त्या रिक्षामध्ये अडकलेल्या महिला प्रवाशाचा  जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचालक राजेश कुमार यादव (४५) हे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी पहाटे ५:४० वाजेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख पोलिस चौकीजवळ घडली. मृत पावलेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे  कासारवडवली पोलिसांनी सांगितले. 

रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने  ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता. यादव याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्यामधील दुभाजकावर आदळली. त्यानंतर रिक्षाला अचानक आग लागली. रिक्षातील महिला प्रवासी रिक्षामध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यादव गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कासारवडवली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविली.

आगीचा भडका उडाला कसा?मृत अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ती ठाण्यात बंगळुरू येथून आलेल्या रेल्वेतून उतरल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजद्वारे उघड झाल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचा इतका भडका कसा उडाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.