शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 19:16 IST

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती.

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती मीरा रोड - मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कडून शटडाऊन व नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटणे व अंबरनाथ येथे जलवाहिनी फुटण्याच्या पाठोपाठ घडलेल्या तांत्रिक कारणांनी विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होत असल्याने पाण्यासाठीची आंदोलने करू नका अशी विनंती महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राजकीय नेत्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे . 

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती. लोकांचे ऐन सणासुदीत पाण्या वाचून हाल झाले. लोक संतप्त झाले होते. आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना स्वतंत्र भेटून पाणी समस्या सोडवण्यासाठी निवेदने दिली. 

दुसरीकडे पाणी पुरवठा सुरळीत व्हायला लागला असताना मनसेने १८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले. शिवसेनेने १८ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले व पुन्हा २० ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्या आधी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी सिल्वरपार्क ते चेकनाका अशी पदफेरी व नंतर अंधेरीच्या एमआयडीसी कार्यालया बाहेर आंदोलन जाहीर केले आहे.

पाणी समस्येला राज्य सरकार व शिवसेना जबाबदार असल्याचा मेहतांचा रोख आहे.   पाणी समस्ये वरून राजकारणी आरोप - प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे पाण्यावरून राजकारण तापले आहे. एमआयडीसी व स्टेमच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली.  त्या अनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले आंदोलने करू नका म्हणून विनंती करत आ. सरनाईक, माजी आ. मेहता आदींना लेखी पत्र देऊन बाजू मांडली आहे. 

नेत्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आयुक्त म्हणतात की, मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून  ८६ दशलक्ष तर एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष असे एकूण २११ दशलक्ष पाणी मंजूर आहे .परंतु एमआयडीसी कडून रोज साधारण ११० दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा केला जातो. तर स्टेम कडूनही मंजूर कोट्या नुसार पूर्ण पाणी मिळत नाही. त्यामुळे रोज सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. तर सध्याच्या लोकसंख्ये नुसार २१५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 

गुरुवार ७ ऑक्टोबर मध्यरात्री ते शुक्रवारी ८ रोजीच्या मध्यरात्री असा २४ तासांचा दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता. शनिवारी ९ रोजी पहाटे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तोच शिळफाटा येथील देसाई गाव ते खिडकाळेश्वर मंदिर पर्यंतची जुनी जीर्ण जलवाहिनी काढून ५.५ किमीची नवीन जलवाहिनी  टाकण्याचे काम पूर्ण केले असताना त्यातील १.२ किमी चा भाग जोडताना दोन वाय तुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाला. 

१० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. अंबरनाथ , जांभुळगाव येथे मुख्य १८०० मिमी ची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणी पुरवठा खंडित झाला. दुरुस्ती काम ११ रोजी मध्यरात्री १.३० वा पूर्ण झाले. व सकाळी ६ वाजता शहराचा पाणी पुरवठा सुरू झाला.  असा सलग ७६ तास पुरवठा बंद होता. शिळफाटा ते कटई दरम्यान जुनी जलवाहिनी सारखी फुटते म्हणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्टेम व एमआयडीसी कडून मंजूर पाणी कोटा मिळावा म्हणून कार्यवाही सुरू आहे. 

सुर्या धरणातून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. ९८ किमीची जलवाहिनीचे काम सुरू आहे. चेणे येथे वन खात्याच्या जमिनीत ४८ दशलक्ष लिटर ची संतुलन टाकी चे काम सुरू होणार आहे. एमएमआरडीए tith पर्यंत सूर्याचे पाणी आणून देणार आहे. तिकडून शहर अंतर्गत  वितरण व्यवस्थेचे जलवाहिन्यांचे जाळे महापालिकेला अंथरावे लागणार आहे. ती योजना पूर्ण झाल्यावर शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

आयोजित आंदोलने मागे घेऊन महापालिकेला सहकार्य करण्याची विनंती आयुक्तांनी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना केली आहे. पत्राची प्रत आयुक्तांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्तांना देखील दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा आता सुरळीत होत असताना वराती मागून आंदोलनाचे राजकीय घोडे नाचवणे तूर्तास थांबेल की नाही ? या कडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर