शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 19:16 IST

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती.

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती मीरा रोड - मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कडून शटडाऊन व नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटणे व अंबरनाथ येथे जलवाहिनी फुटण्याच्या पाठोपाठ घडलेल्या तांत्रिक कारणांनी विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होत असल्याने पाण्यासाठीची आंदोलने करू नका अशी विनंती महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राजकीय नेत्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे . 

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती. लोकांचे ऐन सणासुदीत पाण्या वाचून हाल झाले. लोक संतप्त झाले होते. आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना स्वतंत्र भेटून पाणी समस्या सोडवण्यासाठी निवेदने दिली. 

दुसरीकडे पाणी पुरवठा सुरळीत व्हायला लागला असताना मनसेने १८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले. शिवसेनेने १८ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले व पुन्हा २० ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्या आधी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी सिल्वरपार्क ते चेकनाका अशी पदफेरी व नंतर अंधेरीच्या एमआयडीसी कार्यालया बाहेर आंदोलन जाहीर केले आहे.

पाणी समस्येला राज्य सरकार व शिवसेना जबाबदार असल्याचा मेहतांचा रोख आहे.   पाणी समस्ये वरून राजकारणी आरोप - प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे पाण्यावरून राजकारण तापले आहे. एमआयडीसी व स्टेमच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली.  त्या अनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले आंदोलने करू नका म्हणून विनंती करत आ. सरनाईक, माजी आ. मेहता आदींना लेखी पत्र देऊन बाजू मांडली आहे. 

नेत्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आयुक्त म्हणतात की, मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून  ८६ दशलक्ष तर एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष असे एकूण २११ दशलक्ष पाणी मंजूर आहे .परंतु एमआयडीसी कडून रोज साधारण ११० दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा केला जातो. तर स्टेम कडूनही मंजूर कोट्या नुसार पूर्ण पाणी मिळत नाही. त्यामुळे रोज सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. तर सध्याच्या लोकसंख्ये नुसार २१५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 

गुरुवार ७ ऑक्टोबर मध्यरात्री ते शुक्रवारी ८ रोजीच्या मध्यरात्री असा २४ तासांचा दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता. शनिवारी ९ रोजी पहाटे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तोच शिळफाटा येथील देसाई गाव ते खिडकाळेश्वर मंदिर पर्यंतची जुनी जीर्ण जलवाहिनी काढून ५.५ किमीची नवीन जलवाहिनी  टाकण्याचे काम पूर्ण केले असताना त्यातील १.२ किमी चा भाग जोडताना दोन वाय तुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाला. 

१० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. अंबरनाथ , जांभुळगाव येथे मुख्य १८०० मिमी ची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणी पुरवठा खंडित झाला. दुरुस्ती काम ११ रोजी मध्यरात्री १.३० वा पूर्ण झाले. व सकाळी ६ वाजता शहराचा पाणी पुरवठा सुरू झाला.  असा सलग ७६ तास पुरवठा बंद होता. शिळफाटा ते कटई दरम्यान जुनी जलवाहिनी सारखी फुटते म्हणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्टेम व एमआयडीसी कडून मंजूर पाणी कोटा मिळावा म्हणून कार्यवाही सुरू आहे. 

सुर्या धरणातून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. ९८ किमीची जलवाहिनीचे काम सुरू आहे. चेणे येथे वन खात्याच्या जमिनीत ४८ दशलक्ष लिटर ची संतुलन टाकी चे काम सुरू होणार आहे. एमएमआरडीए tith पर्यंत सूर्याचे पाणी आणून देणार आहे. तिकडून शहर अंतर्गत  वितरण व्यवस्थेचे जलवाहिन्यांचे जाळे महापालिकेला अंथरावे लागणार आहे. ती योजना पूर्ण झाल्यावर शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

आयोजित आंदोलने मागे घेऊन महापालिकेला सहकार्य करण्याची विनंती आयुक्तांनी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना केली आहे. पत्राची प्रत आयुक्तांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्तांना देखील दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा आता सुरळीत होत असताना वराती मागून आंदोलनाचे राजकीय घोडे नाचवणे तूर्तास थांबेल की नाही ? या कडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर