शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 19:16 IST

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती.

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती मीरा रोड - मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कडून शटडाऊन व नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटणे व अंबरनाथ येथे जलवाहिनी फुटण्याच्या पाठोपाठ घडलेल्या तांत्रिक कारणांनी विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होत असल्याने पाण्यासाठीची आंदोलने करू नका अशी विनंती महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राजकीय नेत्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे . 

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती. लोकांचे ऐन सणासुदीत पाण्या वाचून हाल झाले. लोक संतप्त झाले होते. आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना स्वतंत्र भेटून पाणी समस्या सोडवण्यासाठी निवेदने दिली. 

दुसरीकडे पाणी पुरवठा सुरळीत व्हायला लागला असताना मनसेने १८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले. शिवसेनेने १८ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले व पुन्हा २० ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्या आधी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी सिल्वरपार्क ते चेकनाका अशी पदफेरी व नंतर अंधेरीच्या एमआयडीसी कार्यालया बाहेर आंदोलन जाहीर केले आहे.

पाणी समस्येला राज्य सरकार व शिवसेना जबाबदार असल्याचा मेहतांचा रोख आहे.   पाणी समस्ये वरून राजकारणी आरोप - प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे पाण्यावरून राजकारण तापले आहे. एमआयडीसी व स्टेमच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली.  त्या अनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले आंदोलने करू नका म्हणून विनंती करत आ. सरनाईक, माजी आ. मेहता आदींना लेखी पत्र देऊन बाजू मांडली आहे. 

नेत्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आयुक्त म्हणतात की, मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून  ८६ दशलक्ष तर एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष असे एकूण २११ दशलक्ष पाणी मंजूर आहे .परंतु एमआयडीसी कडून रोज साधारण ११० दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा केला जातो. तर स्टेम कडूनही मंजूर कोट्या नुसार पूर्ण पाणी मिळत नाही. त्यामुळे रोज सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. तर सध्याच्या लोकसंख्ये नुसार २१५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 

गुरुवार ७ ऑक्टोबर मध्यरात्री ते शुक्रवारी ८ रोजीच्या मध्यरात्री असा २४ तासांचा दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता. शनिवारी ९ रोजी पहाटे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तोच शिळफाटा येथील देसाई गाव ते खिडकाळेश्वर मंदिर पर्यंतची जुनी जीर्ण जलवाहिनी काढून ५.५ किमीची नवीन जलवाहिनी  टाकण्याचे काम पूर्ण केले असताना त्यातील १.२ किमी चा भाग जोडताना दोन वाय तुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाला. 

१० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. अंबरनाथ , जांभुळगाव येथे मुख्य १८०० मिमी ची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणी पुरवठा खंडित झाला. दुरुस्ती काम ११ रोजी मध्यरात्री १.३० वा पूर्ण झाले. व सकाळी ६ वाजता शहराचा पाणी पुरवठा सुरू झाला.  असा सलग ७६ तास पुरवठा बंद होता. शिळफाटा ते कटई दरम्यान जुनी जलवाहिनी सारखी फुटते म्हणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्टेम व एमआयडीसी कडून मंजूर पाणी कोटा मिळावा म्हणून कार्यवाही सुरू आहे. 

सुर्या धरणातून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. ९८ किमीची जलवाहिनीचे काम सुरू आहे. चेणे येथे वन खात्याच्या जमिनीत ४८ दशलक्ष लिटर ची संतुलन टाकी चे काम सुरू होणार आहे. एमएमआरडीए tith पर्यंत सूर्याचे पाणी आणून देणार आहे. तिकडून शहर अंतर्गत  वितरण व्यवस्थेचे जलवाहिन्यांचे जाळे महापालिकेला अंथरावे लागणार आहे. ती योजना पूर्ण झाल्यावर शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

आयोजित आंदोलने मागे घेऊन महापालिकेला सहकार्य करण्याची विनंती आयुक्तांनी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना केली आहे. पत्राची प्रत आयुक्तांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्तांना देखील दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा आता सुरळीत होत असताना वराती मागून आंदोलनाचे राजकीय घोडे नाचवणे तूर्तास थांबेल की नाही ? या कडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर