शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘वेस्ट टू एनर्जी’चे घोंगडे भिजत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:50 IST

प्रशासनाकडून काहीच हालचाल नाही : कंपनीच्या प्रतिनिधीचे खेटे

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी इंडिया पॉवर या कंत्राटदार कंपनीचा देकार महापालिकेने स्वीकारून सात महिने उलटले तरी त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. कंपनीचा प्रतिनिधी प्रकल्पाच्या कामासाठी सात महिन्यांपासून प्रशासनाकडे खेटे मारत आहे. प्रकल्प उभारणीसाठी पालिकेला पैसे खर्च करावे लागणार नसून केवळ जागा उपलब्ध करून द्यायची आहे. प्रशासनाकडून मिळणाºया थंड प्रतिसादामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कसा मार्गी लागणार, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाच्या माध्यमातून कचºयापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. २००८ पासून महापालिका या प्रकल्पासाठी निविदा मागवत आहे. त्याला प्रतिसादच मिळत नव्हता. या प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे आग्रही होते. २०१७-१८ या वर्षी महापालिकेने या प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा मागवल्या. त्यालाही पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा निविदा मागवली आहे. पॉवर इंडिया व हिताची इंडिया या जॉइंट व्हेंचर कंपनीची एक निविदा महापालिकेस प्राप्त झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये एकच निविदा प्राप्त झाल्याने अन्य प्रतिस्पर्धी नसल्याने व तिसरा निविदा कॉल असल्याने या कंपनीला काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.एक टन कचºयास कंपनीने ६९६ रुपये दर आकारण्याचे मान्य केले आहे. या टीपिंग फीच्या मान्यतेवर घोडे अडले असून ती महापालिकेने मान्य केल्यास वर्षाला जवळपास १२ कोटी ६० लाख रुपये खर्च करावा लागेल. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प नागपुरात सुरू असून त्या प्रकल्पास सरकारचा निधी आहे. केडीएमसीच्या प्रकल्पास निधी नसणार आहे. तरीही नागपूरच्या तुलनेत कंपनीने कल्याण-डोंबिवली महापालिकेस दिलेला दर कमी आहे. वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प २० वर्षांसाठी राबवला जाणार आहे. ६०० टन कचºयावर प्रक्रिया करण्याची प्रकल्पाची क्षमता असणार आहे. सुरुवातीस महापालिकेने ४०० टन कचºयावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आहे. भविष्यात ४०० टन कचºयाऐवजी एक हजार टन कचºयावर प्रक्रिया करण्याची क्षमता केली जाऊ शकते. तेव्हा महापालिकेच्या आसपासच्या नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील कचरा या प्रकल्पात प्रक्रियेसाठी आणला जाऊ शकतो. त्यादृष्टीने आखणी केली आहे.प्रकल्पाच्या उभारणीला काम सुरू झाल्यापासून दोन वर्षे लागू शकतात. ११८ कोटींचा खर्च त्यासाठी येणार आहे. इंडिया पॉवर आणि हिताची जॉइण्ट व्हेंचर असल्याने प्रकल्पाच्या खर्चापैकी ७४ टक्के खर्च इंडिया पॉवर व २६ टक्के खर्चाचा भार हिताची उचलणार आहे.कचरा वर्गीकरणाची गरज नाहीकंपनीकडून दिल्ली येथे तीन प्लांट सुरू आहेत, तर जबलपूर येथे एक प्लांट सुरू आहे. कंपनीकडे कचºयापासून वीजनिर्मितीचा अनुभव असून महापालिकेला प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून द्यायची आहे. या कचºयापासून आठ मेगावॅट वीज तयार होणार आहे. या विजेचे दर वीज नियामक आयोगाकडून मंजूर झाल्यावर त्या दराने बाजारात ही वीज कंपनी विकली जाणार आहे. कचरा वर्गीकरणाची गरज या प्रकल्पात आवश्यक नाही. माती व दगड-विटा सोडून सगळ्या प्रकारच्या कचºयापासून वीजनिर्मिती करता येऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न