शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासाठी स्थायीच्या चाव्या शिवसेना सोडणार?

By admin | Updated: February 13, 2016 02:40 IST

स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह सात सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने आता त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.

ठाणे : स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह सात सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने आता त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. परंतु, या सदस्यांच्या निवडीच्या मुद्यावरून स्थायी समिती सभापतीपदही रिक्त होत असल्याने शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार का, याबाबत मात्र उत्सुकता वाढली आहे.या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सभापती नरेश म्हस्के, रामभाऊ तायडे, सुधीर भगत, राधाफतेबहादूर सिंह, मिलिंद पाटील, सिराज महंमद अली डोंगरे, दीपक वेतकर आणि भाजपाचे संजय वाघुले यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या जागी २० फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महासभेत नव्या आठ सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजपा आणि रिपाइंचा प्रत्येकी एक, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, मागील वर्षी स्थायीच्या चाव्या भाजपाला देण्याचे शिवसेनेने मान्य केले होते. ऐन वेळेस शिवसेनेने उमेदवार उभा केला होता. अखेर, भाजपाला माघार घ्यावी लागली आणि स्थायीच्या चाव्या या शिवसेनेच्या हाती आल्या. त्या वेळेस शेवटचे वर्ष भाजपाला दिले जाईल, असे आश्वासन शिवसेनेने दिले होते. परंतु, आता विधानसभा आणि त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली निवडणुकीत निर्माण झालेला दुरावा पाहता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार का, याबाबत मात्र शंका उपस्थित झाल्या आहेत. महिला बालकल्याण, क्रीडा व समाजकल्याण-सांस्कृतिक, शिक्षण समिती, आरोग्य परिरक्षण, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवडही येत्या महासभेत होणार आहे.