शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातात बळी गेल्यावरच चांगले रस्ते मिळणार का?- महेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:47 IST

डोंबिवली: शहरासह २७ गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असतांना त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी आवाज उठवला की तेवढ्यापुरता डांबरीकरण करुन रस्त्यांना ठिगळ लावली जातात. पणइथे रस्ते नाहीत का? रस्ते अपघाता बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? मुलभूत सुखसुविधांसाठी प्रत्येक वेळी आंदोलनाची हाक का द्यावी लागते. शहराप्रमाणेच ...

ठळक मुद्देइ प्रभाग अधिका-यांना सवालशहरात रस्त्यांना ठिगळ लावली ग्रामीणच्या रस्त्यांची डागडुजी कधी?

डोंबिवली: शहरासह २७ गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असतांना त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी आवाज उठवला की तेवढ्यापुरता डांबरीकरण करुन रस्त्यांना ठिगळ लावली जातात. पणइथे रस्ते नाहीत का? रस्ते अपघाता बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? मुलभूत सुखसुविधांसाठी प्रत्येक वेळी आंदोलनाची हाक का द्यावी लागते. शहराप्रमाणेच एमआयडीसी भाग इथले रस्ते चांगले करता की चक्काजाम करु असा इशारा भाजपचे नगरसेवक डोंबिवली ग्रामिण अध्यक्ष महेश पाटील यांनी दिला.इ-प्रभाग अधिका-यांना त्यांनी सोमवारी पत्र दिले. पण आता पत्रव्यवहार करत असून त्यात सुधारणा झाली नाही तर मात्र आंदोलन करणार, त्यात जर वाहतूक ठप्प झाली आणि कोणाचे नुकसान झाले तर मात्र त्याची जबाबदारी केडीएमसी प्रशासनाची असेल. २७ गावांमध्ये पाणी नाही, रस्ते नाही. आरोग्य नाही. दळणवळणाच्या साधनांचा तुटवडा, हे किती वर्ष का चालणार. नागरिक लोकप्रतिनिधी म्हणुन आम्हाला विचारतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना नाकी नऊ येतात. शहरातले रस्ते केले त्याचवेळी सागाव, सागर्ली, भोपर, पाथर्ली यासह गावांमधील रस्ते चांगले का केले नाहीत. आईस फॅक्ट्रीवरुन जो रस्ता महामार्गाकडे जातो तो तर वर्षानूवर्षे कधी चांगला केलाच नाही असे वाटते. एमआयडीसीकडे तो भाग आहे की, महापालिकेकडे हे प्रशासनाने बघावे. त्यात नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना त्रास नसावा. खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळतच नसल्याचे ते म्हणाले.रातोरात शहरातले जे रस्ते झाले त्या कामाच्या पाहणीसाठी महापौर राजेंद्र देवळेकरांसह जाणकार नेते उपस्थित होते. त्यांना एमआयडीसी परिसरातील रस्ते माहित नव्हते की अंतर्गत रस्त्यांची माहितीच दिली जात नाही असा सवाल पाटील यांनी केला. ग्रामिण भागाचा दौरा सातत्याने करणे आवश्यक असून तेथिल नागकिांना भेडसावणा-या कच-याच्या, पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी इ प्रभाग अधिका-यांना केले.------------------- 

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली