शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मला काय मेल्यावर घर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:36 IST

कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे. प्रकल्पबाधित असलेल्या शालूबाई खांडे या वृद्ध महिला २००४ सालापासून घरासाठी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी मंगळवारी पुन्हा महापालिका मुख्यालयात घरासाठी खेटे घातले, पण महासभेत व्यस्त असलेल्या प्रशासनाला त्यांच्याकडे पाहण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला काय मेल्यावर घर मिळणार आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी केला.शालूबाई यांचे वय ६० वर्षाचे आहे. त्या इंदिरानगरात राहत होत्या. रस्ते विकासकामात त्याचे घर बाधित झाले. त्यांचे पुनर्वसन उंबर्डे येथील सेक्टर ‘ई’ मधील प्लॉट क्रमांक ३८ मध्ये करण्यात आल्याचे महापालिकेने त्यांना लेखी कळविले होते. वाटप करण्यात आलेल्या भूखंडात महापालिकेच्या प्रशासनाने बदल केला. त्यानंतर पुन्हा नऊ जणांची यादी नव्याने वाटप करण्यात आलेल्या भूखंडासह देण्यात आली. त्या यादीत शालूबाई यांना उंबर्डे येथेच सेक्टर ‘ए’ मधील प्लॉट क्रमांक चार दिल्याचे सांगण्यात आले. नव्याने वाटप करण्यात आलेल्या यादीवरही शहर अभियंत्याची स्वाक्षरी होती. ही यादी २००४ साली शालूबाईसह अन्य प्रकल्पबाधितांना देण्यात आली. पण अजूनही त्यांचे पुनवर्सन झाले नाही. त्यांना त्यांच्या वाट्याचे घर अद्याप मिळालेले नाही.महासभेनिमित्ताने पुन्हा त्या मंगळवारी महापालिका मुख्यालयात आल्या. पण महासभेत व्यस्त असल्याने त्यांनी अधिकारी भेटले नाहीत. मुख्यालयाच्या आवारात एका कट्टयावर बसून त्या घराची याचना करीत होत्या. २००४ सालापासून त्या पाठपुरावा करीत आहेत. तरी त्यांना अद्याप घर मिळालेले नाही. आता घर मिळणार नसेल तर मी मेल्यावर पालिका मला घर देणार आहे का, असा संतप्त सवाल शालूबाई यांनी उपस्थित केला. त्यांची हाक ऐकून शिवसेना नगरसेवक सुनिल वायले यांनी त्यांना सोबत घेत मालमत्ता विभागाच्या अधिकाºयांचे दालन गाठले. तसेच शालूबार्इंची कागदपत्रे सादर केली. चार दिवसात हे प्रकरण मार्गी लावू, असे आश्वासन घेऊन शालूबाई रिकाम्या हातीच निराश होऊन घरी परतल्या...