शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मला काय मेल्यावर घर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:36 IST

कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे. प्रकल्पबाधित असलेल्या शालूबाई खांडे या वृद्ध महिला २००४ सालापासून घरासाठी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी मंगळवारी पुन्हा महापालिका मुख्यालयात घरासाठी खेटे घातले, पण महासभेत व्यस्त असलेल्या प्रशासनाला त्यांच्याकडे पाहण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला काय मेल्यावर घर मिळणार आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी केला.शालूबाई यांचे वय ६० वर्षाचे आहे. त्या इंदिरानगरात राहत होत्या. रस्ते विकासकामात त्याचे घर बाधित झाले. त्यांचे पुनर्वसन उंबर्डे येथील सेक्टर ‘ई’ मधील प्लॉट क्रमांक ३८ मध्ये करण्यात आल्याचे महापालिकेने त्यांना लेखी कळविले होते. वाटप करण्यात आलेल्या भूखंडात महापालिकेच्या प्रशासनाने बदल केला. त्यानंतर पुन्हा नऊ जणांची यादी नव्याने वाटप करण्यात आलेल्या भूखंडासह देण्यात आली. त्या यादीत शालूबाई यांना उंबर्डे येथेच सेक्टर ‘ए’ मधील प्लॉट क्रमांक चार दिल्याचे सांगण्यात आले. नव्याने वाटप करण्यात आलेल्या यादीवरही शहर अभियंत्याची स्वाक्षरी होती. ही यादी २००४ साली शालूबाईसह अन्य प्रकल्पबाधितांना देण्यात आली. पण अजूनही त्यांचे पुनवर्सन झाले नाही. त्यांना त्यांच्या वाट्याचे घर अद्याप मिळालेले नाही.महासभेनिमित्ताने पुन्हा त्या मंगळवारी महापालिका मुख्यालयात आल्या. पण महासभेत व्यस्त असल्याने त्यांनी अधिकारी भेटले नाहीत. मुख्यालयाच्या आवारात एका कट्टयावर बसून त्या घराची याचना करीत होत्या. २००४ सालापासून त्या पाठपुरावा करीत आहेत. तरी त्यांना अद्याप घर मिळालेले नाही. आता घर मिळणार नसेल तर मी मेल्यावर पालिका मला घर देणार आहे का, असा संतप्त सवाल शालूबाई यांनी उपस्थित केला. त्यांची हाक ऐकून शिवसेना नगरसेवक सुनिल वायले यांनी त्यांना सोबत घेत मालमत्ता विभागाच्या अधिकाºयांचे दालन गाठले. तसेच शालूबार्इंची कागदपत्रे सादर केली. चार दिवसात हे प्रकरण मार्गी लावू, असे आश्वासन घेऊन शालूबाई रिकाम्या हातीच निराश होऊन घरी परतल्या...