शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

मला काय मेल्यावर घर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:36 IST

कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या रस्ते विकासकामात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे उंबर्डे येथे पुनर्वसन करण्याचे महापालिकेने लिहून दिल्यानंतरही गेली १४ वर्षे घर मिळत अनेकांच्या पदरी वनवास आला आहे. प्रकल्पबाधित असलेल्या शालूबाई खांडे या वृद्ध महिला २००४ सालापासून घरासाठी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी मंगळवारी पुन्हा महापालिका मुख्यालयात घरासाठी खेटे घातले, पण महासभेत व्यस्त असलेल्या प्रशासनाला त्यांच्याकडे पाहण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला काय मेल्यावर घर मिळणार आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी केला.शालूबाई यांचे वय ६० वर्षाचे आहे. त्या इंदिरानगरात राहत होत्या. रस्ते विकासकामात त्याचे घर बाधित झाले. त्यांचे पुनर्वसन उंबर्डे येथील सेक्टर ‘ई’ मधील प्लॉट क्रमांक ३८ मध्ये करण्यात आल्याचे महापालिकेने त्यांना लेखी कळविले होते. वाटप करण्यात आलेल्या भूखंडात महापालिकेच्या प्रशासनाने बदल केला. त्यानंतर पुन्हा नऊ जणांची यादी नव्याने वाटप करण्यात आलेल्या भूखंडासह देण्यात आली. त्या यादीत शालूबाई यांना उंबर्डे येथेच सेक्टर ‘ए’ मधील प्लॉट क्रमांक चार दिल्याचे सांगण्यात आले. नव्याने वाटप करण्यात आलेल्या यादीवरही शहर अभियंत्याची स्वाक्षरी होती. ही यादी २००४ साली शालूबाईसह अन्य प्रकल्पबाधितांना देण्यात आली. पण अजूनही त्यांचे पुनवर्सन झाले नाही. त्यांना त्यांच्या वाट्याचे घर अद्याप मिळालेले नाही.महासभेनिमित्ताने पुन्हा त्या मंगळवारी महापालिका मुख्यालयात आल्या. पण महासभेत व्यस्त असल्याने त्यांनी अधिकारी भेटले नाहीत. मुख्यालयाच्या आवारात एका कट्टयावर बसून त्या घराची याचना करीत होत्या. २००४ सालापासून त्या पाठपुरावा करीत आहेत. तरी त्यांना अद्याप घर मिळालेले नाही. आता घर मिळणार नसेल तर मी मेल्यावर पालिका मला घर देणार आहे का, असा संतप्त सवाल शालूबाई यांनी उपस्थित केला. त्यांची हाक ऐकून शिवसेना नगरसेवक सुनिल वायले यांनी त्यांना सोबत घेत मालमत्ता विभागाच्या अधिकाºयांचे दालन गाठले. तसेच शालूबार्इंची कागदपत्रे सादर केली. चार दिवसात हे प्रकरण मार्गी लावू, असे आश्वासन घेऊन शालूबाई रिकाम्या हातीच निराश होऊन घरी परतल्या...