शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

घोडबंदरचा बाजार उठणार?

By admin | Updated: May 7, 2017 06:03 IST

घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने या परिसरात उभ्या राहिलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने या परिसरात उभ्या राहिलेल्या व राहण्याच्या प्रक्रियेत असलेल्या २८५ नव्या इमारतींना सीसी आणि ओसी न देण्याचे महापालिकेने ठरवले आहे. त्यामुळे ठाण्यातील ‘मलबार हिल’ अशी ओळख असलेल्या घोडबंदर रोडवरील फ्लॅटखरेदीला मोठा फटका बसण्याची व तेथील जागांचे चढे दर कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेने नव्या इमारतींना ओसी दिली नाही, तर त्यांना पाणी मिळणे दुरापास्त होईल. इमारतीला पाणीच नसेल, तर कितीही प्रीमिअम फ्लॅट असले, तरी त्याला ग्राहक मिळणार नाही आणि याचा थेट परिणाम फ्लॅट बुकिंगवर होणार असल्याने विकासक हवालदिल झाले आहेत. सध्या ज्या इमारतींना अपुरा पाणीपुरवठा होत आहे, त्यांना ओसी असली तरी तेथील फ्लॅटला ग्राहक मिळणार नसल्याने घोडबंदर रोडच्या मालमत्तांचे दर कोसळून तेथील विकासकांचा बाजार उठण्याची भीती निर्माण झाली आहे. घोडबंदर भागात रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, याचा विचार न करताच नव्या बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळेच आता नव्या बांधकामांना परवानगी नकोच, असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदरमधील बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र व निवासाचा दाखला न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले आहेत.जुने ठाणे अपुरे पडू लागल्याने नवे ठाणे अर्थात घोडबंदरचा विकास झाला. मागील सात ते आठ वर्षांत या भागाचा झपाट्याने टॉवर उभे राहिले. या भागातील रस्ता रुंदीकरण झाल्याने बड्या बिल्डरांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली. अनेक नामवंत विकासकांच्या टोलजंग इमारतींची कामे येथे सुरू आहेत. अनेक इमारती तयार झाल्या असल्या, तरी त्याठिकाणचे भाव अधिक असल्याने बहुसंख्य इमारतींमधील फलॅट शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांची विक्री करण्यासाठी विकासक आता ग्राहकांना विविध योजनांचे आमिष दाखवत आहेत. परंतु, आजही येथील नव्याने तयार झालेल्या इमारतींमधील ४० टक्के फलॅट रिकामे असल्याची माहिती काही विकासकांनी दिली. असे असतानाच आता न्यायालयाचे आदेश व महापालिकेची कारवाई यामुळे विकासकांचे कंबरडे मोडणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे धाबे दणाणलेल्या विकासकांनी शनिवारी शहर विभागात धाव घेतली. परंतु, जोपर्यंत न्यायालयाचा पुढील निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणतीही परवानगी न देण्याचा आणि ज्यांचे इमारतबांधणीचे प्रस्ताव आले असतील, त्यांच्यावरदेखील विचार न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. न्यायालयाच्या या आदेशांना लागलीच वरच्या न्यायालयात आव्हान द्यावे की, पाऊस होऊन पाणी परिस्थिती सुधारेपर्यंत कळ काढावी, यावर विकासकांच्या संघटनांमध्ये विचारविनिमय सुरू आहे. घोडबंदर परिसरातील बहुतांश फ्लॅट हे गुंतवणूक म्हणून खरेदी केले जातात. येथील पाणीपुरवठा अपुरा असेल व भविष्यात शेकडो इमारती उभ्या राहिल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असेल, तर गुंतवणुकीच्या हेतूने फ्लॅटखरेदी करण्यातील उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत यांचा कल कमी होईल. याचा दूरगामी फटका घोडबंदर येथील विकासाला बसेल, असे स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. विकासकांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाच्या निर्णयामुळे पालिकेने कारवाई केली, तरीही घोडबंदरच्या फलॅटचे दर खाली येणार नाहीत. मात्र, बुकिंगवर परिणाम होईल.घोडबंदर परिसरात ३ दशलक्ष लीटरची तूटघोडबंदर भागातील पाच लाख लोकसंख्येला पुरेल, एवढा पुरेसा पाणीपुरवठा या भागाला होत असल्याचा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. आजघडीला या भागात ९१ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असताना येथे ८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तसेच या भागातील पाणीपुरवठा आणखी सक्षम करण्यासाठी रिमॉडेलिंगची योजना पुढे आली आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे भविष्यात या भागाला पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.