शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बदलापूरातील पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 20:31 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

बदलापूर : शिवसेना आणि भाजपाची सत्ता म्हणजे रयतेची सत्ता आहे. शिवरायांना अभिप्रेत असलेली कामे करण्याचे काम आमचे सरकार करत आहे. महाराजांच्या तत्वानुसार चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारचे सर्व निर्णय नागरिकांच्या हिताच्या हेतूनचे घेतले जात आहेत. नुकत्याच आलेल्या महापुरात बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाचा संसार उभा करण्यासाठी शासन भरीव मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुरबाडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, नव्या पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन, मुरबाड बस आगाराचे भूमिपूजन, धान्य साठवणगृहाचे भूमिपूजन आणि म्हसा महाविद्यालयाचे भूमिपूजन असा मोठा सोहळा मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी २७ जुलैच्या महापुरात ठाणे जिल्ह्यासह बदलापूरातील बाधित कुटुंबियांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. २००५च्या महापुरात जी मदत करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त मदत कशी करता येईल याचा निर्णय शासन घेणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेशदेखील शासन काढेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुराच्या परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी शासन स्तरावर आम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरले. पुरात कोणतीही जीवितहानी होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आता ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचा संसार नव्याने कसा सुरु करता येईल यासाठी शासन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुरबाडमधील विकास कामांचे उद्घाटन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उर्जा देणारा पुतळा आहे. केवळ पुतळा उभारुन त्याची पूजा करण्याऐवजी त्या छत्रपती महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून नागरिकांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेले राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरच पोलीस स्टेशन असल्याने पोलीसदेखील आता त्यातुन उर्जा घेतील आणि महाराजांच्या स्वराज्यात जसे पोलीस वागत होते, तसे मुरबाडचेही पोलीस वागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुरबाड मतदारसंघात काम करताना या ठिकाणी नागरिकांना काय हवे आहे याची कल्पना आमदार कथोरे यांना असल्याने ते शासनाकडे पाठपुरावा करताना तशा पद्धतीनेच मागणी करतात. त्यामुळे त्यांची मागणी नाकारण्याची धमक शासनात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरबाड मतदारसंघात कामे झाली आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात मुरबाडचाही समावेश केल्याने आता मुरबाडला दुहेरी मदत होणार आहे. पूर्वीचे सरकार एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात केवळ ५०० ते ६०० कोटींची कामे करित होते. मात्र आमच्या सरकारच्या काळात एकाच विधानसभेत ५०० कोटींपेक्षा जास्तीची कामे होतात. खऱ्या अर्थाने एमएमआरडीएचा लाभ ठाणे जिल्ह्याला झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नगराध्यक्षा शितल तोंडलीकर  आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :floodपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस