शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

इंजीन देणार बाळ्यामामांना स्पीड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 02:02 IST

मोदींविरोधात लढाई : मनसेचे पदाधिकारी झाले सैरभैर

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपसह सर्वच पक्षांना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. या बंडखोरांना आवरण्यासाठी पक्षनेत्यांना बैठका घ्याव्या लागणार आहेत. या निवडणुकीत मनसे रिंगणात नसल्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सैरभैर झाले आहेत. त्यामुळे मनसेचे इंजीन नक्की कुणाला बळ देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे रिंगणात असताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षातून निलंबित केले. परिणामी, शिवसेनेचा एक गट युतीच्या उमेदवाराविरोधात काम करणार आहे. सुरेश म्हात्रे हे काही काळ मनसेत होते. त्यांनी मनसेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्याशी परिचित असलेला मनसेचा एक गट म्हात्रेंसोबत राहणार असल्याचे दिसत आहे.याचा भाजपच्या पारंपरिक मतांवर परिणाम होण्याचीही शक्यता असून, अपक्ष बाळ्यामामा म्हात्रे यांना बळ मिळण्याची शक्यता बळावली आहे.मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?२००९ साली भिवंडी लोकसभा निवडणुकीत मनसेचे देवराज के. म्हात्रे यांनी एक लाख नऊ हजार मते मिळवली होती. त्यानंतर, कल्याण विधानसभा क्षेत्रातून प्रकाश भोईर निवडून आले होते. २०१४ साली बाळ्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ९३ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात मनसेची एक लाखाच्या आसपास मते आहेत. यावेळी मनसे लोकसभा निवडणुकीत नाही. त्यामुळे लाख मतांचे धनी असलेले मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत कोणाला बळ देणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी स्वत:ची वेगळी चूल मांडून भाजपविरोधात काम करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीMNSमनसे