शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बोगस मतदारांचा समावेश असलेल्या यादीनुसार होणार निवडणूक? आयोग, नगरपालिकेत समन्वयाचा अभाव : काँग्रेसची प्रशासनावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीच्या विधानसभा निवडणुकीवे‌‌ळी तयार केलेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ...

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीच्या विधानसभा निवडणुकीवे‌‌ळी तयार केलेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या मतदारयादीत जी बोगस नावे होती, ती काढून टाकण्यासाठी ज्या हरकती मतदार नोंदणी कार्यक्रमादरम्यान घेण्यात आल्या होत्या, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. बोगस नावे काढून टाकल्याखेरीज यादी ग्राह्य मानण्यास विरोध होत आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेसाठी विधानसभेची १५ जानेवारी २०२१ रोजी जी मतदारयादी तयार करण्यात आली त्या मतदार यादीनुसार निवडणुकीचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्या यादीतील बोगस नावांसंदर्भात काँग्रेसच्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्या हरकतींवर तहसीलदार कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. बोगस नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात आली. काँग्रेसचे उमेश पाटील आणि किरण राठोड यांनी याप्रकरणी हरकत घेतली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली. मात्र आयोग व नगरपालिका या दोन शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचा फटका उमेदवारांना बसला. मतदार यादीमधील बोगस नावे उघड झालेली असताना आणि ती वगळण्याचे आदेश असतानाही ती वगळण्याबाबत विलंब केला जात आहे. पालिका प्रशासन ती बोगस नावे मतदारयादीत समाविष्ट असताना त्याआधारे निवडणूक घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भात राठोड आणि पाटील यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आयोगाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.

.............

‘‘ आयोगाकडून आम्हाला १५ जानेवारीच्या यादीनुसार काम करण्याचे आदेश आले आहेत. ती यादी घेऊन आम्ही काम सुरू केले आहे. त्यानंतर काही नावे वगळण्याचे आदेश आले असतील, तर त्यासंदर्भात आम्हाला आयोगाकडून आदेश येणे गरजचे आहे. आम्हाला आदेश आल्यावरच आम्ही पुढील कार्यवाही करू.

-डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी. अंबरनाथ नगरपरिषद

..............

वाचली