शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शेतीची कामे करणार रोजगार हमी योजनेतून; शेतकऱ्यांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:37 IST

अवकाळी पावसामुळे कापून पडलेला भात शेतातच ओला झाला. एवढेच काय तर भाताला कोम येऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

ठाणे : यंदा ओल्या दुष्काळाची स्थिती उद्भवून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासह त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यंदा शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजना म्हणजेच एमआरईजीएसद्वारे करण्याचा ठराव ठाणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन संकटकाळात शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळून त्यांना भरिव मदत होणार आहे.

अवकाळी पावसामुळे कापून पडलेला भात शेतातच ओला झाला. एवढेच काय तर भाताला कोम येऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या बिकट स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या शेतातील काम एमआरईजीएसद्वारे करून त्यास या कामाची मजुरी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुभाष घरत या ठरावासाठी आग्रही होते. याबाबत लेखी निवेदनही त्यांनी आधीच अध्यक्षांना देऊन हा विषय सभागृहात मांडला. त्यास सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी सहमती देत एकमताने ठराव घेण्यात आला.

अवकाळी पावसाने शेताचे बांध तुटले, फुटले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसह शेत जमिनीचे सपाटीकरण, फळलागवड, बांधावरील वृक्ष लागवड आदी विविध कामे शेतकऱ्यांना स्वत: करावी लागतात. त्यासाठी मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना नेहमीच सोसावी लागते. जिल्हा परिषदेच्या निर्णयामुळे त्यातून त्यांची सुटका तर होणारच आहे, याशिवाय  शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून केली जाणार असल्याने या कामाची मजुरीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकप्रकारे दुहेरी लाभ मिळणार आहे.

वर्षभर मिळवून देणार कामशेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतीसंबंधी विविध कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. याशिवाय शौचखड्डे, साफसफाईची कामे, गाव स्वच्छता आदी कामे जिल्हा परिषद आता प्राधान्याने घेऊन शेतकऱ्यांसह गावपाड्यांतील मजुरांच्या हाताला वर्षभर काम मिळवून देणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी