शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

शेतीची कामे करणार रोजगार हमी योजनेतून; शेतकऱ्यांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:37 IST

अवकाळी पावसामुळे कापून पडलेला भात शेतातच ओला झाला. एवढेच काय तर भाताला कोम येऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

ठाणे : यंदा ओल्या दुष्काळाची स्थिती उद्भवून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासह त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यंदा शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजना म्हणजेच एमआरईजीएसद्वारे करण्याचा ठराव ठाणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन संकटकाळात शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळून त्यांना भरिव मदत होणार आहे.

अवकाळी पावसामुळे कापून पडलेला भात शेतातच ओला झाला. एवढेच काय तर भाताला कोम येऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या बिकट स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या शेतातील काम एमआरईजीएसद्वारे करून त्यास या कामाची मजुरी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुभाष घरत या ठरावासाठी आग्रही होते. याबाबत लेखी निवेदनही त्यांनी आधीच अध्यक्षांना देऊन हा विषय सभागृहात मांडला. त्यास सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी सहमती देत एकमताने ठराव घेण्यात आला.

अवकाळी पावसाने शेताचे बांध तुटले, फुटले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसह शेत जमिनीचे सपाटीकरण, फळलागवड, बांधावरील वृक्ष लागवड आदी विविध कामे शेतकऱ्यांना स्वत: करावी लागतात. त्यासाठी मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना नेहमीच सोसावी लागते. जिल्हा परिषदेच्या निर्णयामुळे त्यातून त्यांची सुटका तर होणारच आहे, याशिवाय  शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून केली जाणार असल्याने या कामाची मजुरीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकप्रकारे दुहेरी लाभ मिळणार आहे.

वर्षभर मिळवून देणार कामशेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतीसंबंधी विविध कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. याशिवाय शौचखड्डे, साफसफाईची कामे, गाव स्वच्छता आदी कामे जिल्हा परिषद आता प्राधान्याने घेऊन शेतकऱ्यांसह गावपाड्यांतील मजुरांच्या हाताला वर्षभर काम मिळवून देणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी