शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोणाच्याही घराची वीज कापलीत तर...; विजेच्या वाढत्या बिलांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 11:36 IST

ठाण्यात वाढत्या वीज बिलांविरोधात मनसे आक्रमक

ठाणे: कोरोना संकट आणि त्यामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यातच वीज कंपन्या अव्वाच्या सव्वा बिलं पाठवत असल्यानं सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. याविरोधात आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणाच्याही घरातील वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसोबत सरकारी कार्यालयांमधील वीज कापू, असा इशारा मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता त्यांना वाढीव वीज बिलं पाठवून आणखी मनस्ताप देण्यात येत असल्याचं जाधव म्हणाले. 'ठाण्याच्या हिरानंदनी भागातील एका महिलेला आधी हजार रुपये बिल यायचं. आता ते थेट २० हजारांवर गेलं आहे. त्या महिलेची तक्रार ऐकून घेण्यासाठी गेलो असता, तिथे आणखी १०० माणसं भेटली. त्यांचीदेखीस तिच तक्रार होती. आधी ज्यांना २ हजार रुपये बिल यायचं, त्यांना आता २० हजारांचं बिल पाठवण्यात येत आहे,' असं जाधव म्हणाले.'सध्या कोरोनामुळे अनेकजण घरीच थांबले आहेत. त्यामुळे २ हजार रुपये येणारं वीज बिल तीन-साडे तीन हजार आल्यास समजू शकतो. पण ते थेट २० हजार कसं काय येतं?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारनं घर मालकांना, दुकान मालकांना भाडं वसूल न करण्याचं आवाहन केलं. अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मग आता सरकारनं गेल्या तीन महिन्यांचं वीज बिल माफ करावं, अशी मागणी जाधव यांनी केली. ठाण्यात कोणाचीही वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसह सरकारी कार्यालयांची वीज कापेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. आधीच अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. काहींना बिनपगारी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींनी वीज बिलं कशी भरायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या लोकांना कोरोनापेक्षा वीज बिलाची भीती वाटू लागली असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाelectricityवीज