शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भाजपची खेळी यशस्वी होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:23 IST

राजकारणात कोण कधी मित्र होईल किंवा शत्रू होईल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये सतत सतर्क राहावे लागते. सत्ता स्थापनेसाठी भाजपने साई पक्ष, ओमी टीमची मदत घेतली.

सदानंद नाईक

राजकारणात कोण कधी मित्र होईल किंवा शत्रू होईल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये सतत सतर्क राहावे लागते. सत्ता स्थापनेसाठी भाजपने साई पक्ष, ओमी टीमची मदत घेतली. मात्र, लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होऊन राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. त्यामुळे स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेना यांची महापालिकेच्या सत्तेत युती होणार का? एकत्र आल्यास सत्तेत स्थान काय? आदींची चर्चा शहरात सुरू झाली. स्थायी समिती सदस्यांची निवड होऊन सभापती निवडणुकीत ओमी टीम व साई पक्षाला दूर सारून शिवसेनेच्या मदतीने सभापतीपद भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सहा महिन्यांपूर्वी महापौर निवडणुकीच्यावेळी आमने-सामने उभे ठाकलेले शिवसेना व भाजपा पक्षांचे नेते लोकसभा निवडणुकीतील युतीमुळे एकत्र आले. युती होताच दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते गळ्यात गळे घालून फिरू लागल्याने सत्ताबदलाचे वारे वाहू लागले. महापालिकेवर भाजप, ओमी टीम व साई पक्षाची सत्ता असली, तरी दोनअडीच वर्षांमध्ये त्यांच्या नेत्यांत व नगरसेवकांत मनोमिलन झाले नाही. त्यांच्यातील अनेक वाद चव्हाट्यावर आले. महापौर, स्थायी समिती सभापतीपदासह इतर पदांबाबत त्यांच्यात वाद होऊन विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत ओमी टीमने थेट शिवसेनेसोबत हातमिळवणी करून सभापतीपद पदरात पाडून घेतले. तर, एका सभापतीपदाची शिवसेनेला लॉटरी लागली होती.

महापालिकेत भाजप व ओमी कलानी टीमचे एकूण ३२ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी १५ पेक्षा जास्त नगरसेवक ओमी समर्थक आहेत. ओमी समर्थक नगरसेवक कधीही भाजपच्या बैठकीला गेले नाही. तसेच महापौर, उपमहापौर, विशेष व प्रभाग समिती सभापतीपदावरून दरवर्षी रुसवेफुगवे सुरूच आहेत. भाजप व शिवसेना एकत्र आल्यास महापौरांसह इतर पदेही युतीकडे राहणार असून शहर विकास साधल्याचे बोलले जाते. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या ३२ पैकी १५ पेक्षा जास्त नगरसेवक कट्टर भाजप समर्थक आहेत, तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. १५ व २५ असे एकूण ४० नगरसेवक युतीचे असून महापालिकेत बहुमताचा आकडाही ४० आहे. अशा परिस्थितीत ओमी टीम व साई पक्षासह इतर लहान पक्षांची मदत घ्यावी लागणार नाही.

दरम्यान, स्थायी समितीच्या आठ सदस्यांसाठी २ मे रोजी निवडणूक होत आहे. भविष्यातील युतीचा विचार करूनच भाजप हा ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना डावलून कट्टर भाजप समर्थक नगरसेवकांना स्थायी समितीत पाठवणार आहे. स्थायी समितीत भाजप-६, साई- ३, शिवसेनेचे- ५ व राष्ट्रवादी व रिपाइं प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. शिवसेना व भाजप एकत्र आल्यास स्थायी समिती सभापतीपद शिवसेना किंवा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. एकूणच शहरातील राजकारण बघता लोकसभा निवडणुकीनंतर ओमी टीम व साई पक्ष अडगळीत जाण्याची शक्यता आहे. किंवा भाजप व शिवसेना ठरवेल, ती पदे घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

सात नगरसेवकांवर विरोधी पक्षाची जबाबदारीराष्ट्रवादीचे- ४, भारिप, पीआरपी व काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी १ असे एकूण सात नगरसेवक विरोधी पक्षाची भूमिका वठवण्याची शक्यता आहे.स्थायी समितीसह महासभेत कधीही शिवसेना आक्रमक दिसली नाही. उलट, सत्ताधारी पक्षाने आणलेल्या प्रत्येक विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर