शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

जितेंद्र आव्हाडांना अटक का नाही ?

By admin | Updated: August 18, 2015 23:23 IST

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून संपूर्ण राज्यात वादविवाद सुरु असताना राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाने तर चक्क शिवाजी महाराजांच्या वंशजावरच

ठाणे : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून संपूर्ण राज्यात वादविवाद सुरु असताना राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाने तर चक्क शिवाजी महाराजांच्या वंशजावरच अविश्वास दाखवला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांची भूमिका मान्य नसल्याचे मत अभियानाचे अध्यक्ष दिलीप अलोणी व्यक्त केले आहे. पुरंदरे यांनी मांडलेल्या इतिहासाला छेद देण्याचे लिखाण पुरषोत्तम खेडेकर आणि श्रीमंत कोकाटे करत असून त्यांच्यावर देखील त्यांनी जाहीर टीका केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झाले असून यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. मनसे आणि सेनेने पुरस्काराला पाठींबा दर्शवला असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने विरोध केला आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाच्या वतीने मंगळवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे संभाजी ब्रिगेड शिवसन्मान जागर परिषद घेण्याचे काम करीत आहेत. आव्हाड हे अशा परिषदेमधून जातीय द्वेष पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भावना भडकावल्याचा गुन्हा दाखल होऊनही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)