शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एवढा रस का..?

By संदीप प्रधान | Updated: August 14, 2023 09:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यावर ठाण्यात आले व त्यांनी ठाण्यात क्रांती करण्याची भाषा केली.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यावर ठाण्यात आले व त्यांनी ठाण्यात क्रांती करण्याची भाषा केली. ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, तर पुणे अजित पवार यांचे अन् नागपूर देवेंद्र फडणवीस यांचे अशी सत्तेची व सत्तेमधील तिन्ही पक्षांच्या बालेकिल्ल्यांची विभागणी केली जाऊ शकते. यातून संघर्ष टळू शकतो. मात्र, सध्या राजकीय सोयीकरिता एकमेकांचा हात धरलेल्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना हे ठाऊक आहे की, भविष्यात जर राजकारणात स्वबळावर टिकायचे तर एका पक्षाने दुसऱ्याला गिळल्याखेरीज सत्तेचा मोठा वाटा पदरात पडणार नाही. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला गिळून राष्ट्रवादीला मोठे व्हायचे आहे. शिंदे यांनीही मध्यंतरी पुण्यात शिवसैनिकांची बैठक घेतली.

मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेचे फिसकटल्यावर राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार ही जर तडजोड होती तर सध्याचे महायुतीचे सरकार हीदेखील तडजोड आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे राहणार की नाही, याबाबत सतत वावड्या उठतात. ठाण्यातील कार्यक्रमाला अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस हजर राहिले नाही की, मतभेदांची कुजबुज सुरू होते. कार्यबाहुल्याने थकवा आल्यामुळे शिंदे गावी आराम करायला गेले तर ठाण्यासह महाराष्ट्रात अफवांचे पीक आले. मध्यंतरी फडणवीस यांनी शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार, असे सांगितले. अजित पवार यांनी पुण्यात आम्हा दोघा उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा नाही, असे जाहीर केले. मात्र, तरीही अनिश्चितता, अफवा थांबत नाहीत. याचे कारण भाजपमध्ये सर्व निर्णय दिल्लीत होतात.

ठाण्यातील राजकीय सौहार्द संपले

- ठाण्यात आतापर्यंत दोन पक्ष प्रबळ राहिले. एक शिवसेना तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेनेकडे सत्ता राहिली तर राष्ट्रवादी विरोधक. अर्थात ठाण्यातील नेते एकमेकांचे वैरी कधीच नव्हते. एका ताटात खात होते. जनादेशाच्या मोडतोडीमुळे ठाणे ही रणभूमी बनलेय. एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड एकमेकांचे वैरी बनले. शिंदे व राजन विचारे हे परस्परांच्या विरोधात उभे राहिले.

- सत्तेत सेना-भाजप एकत्र असले तरी शिंदेशाहीवर भाजपचे आमदार संजय केळकर तोंडसुख घेताना दिसतात. मुंबईबरोबर ठाणे महापालिकेच्या चौकशीची मागणी करतात. शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडतात.

- कालपर्यंत आव्हाडांची सावली होऊन फिरणारे आनंद परांजपे हे आता आव्हाडांच्या नावाने कडाकडा बोटं मोडू लागलेत. राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना धमक्या देत आहेत. गुन्हे दाखल करीत आहेत. ठाण्याच्या राजकारणातील सौहार्द, समंजसपणा जनादेश धाब्यावर बसविल्याने संपला आहे.

- पवारांनी शिंदेंना ठाण्यात गिळले तर पवार टिकणार आणि फडणवीस यांनी पवार-शिंदे यांचे पाय कापले तर भाजपला स्वबळावर सत्ता प्राप्त होऊन पक्षाच्या उपाशी आमदारांना सत्ता दिसणार, अशी विचित्र गळाकापू अवस्था सध्या आहे.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे