शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भय इथले का संपत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:05 IST

भिवंडीत वारंवार बलात्कार, हत्येच्या घटना घडत असल्याने हा भाग बदनाम झाला आहे.

- नितीन पंडित, भिवंडीभिवंडीत वारंवार बलात्कार, हत्येच्या घटना घडत असल्याने हा भाग बदनाम झाला आहे. बलात्कारासारख्या घटना घडल्या की, त्यासाठी सर्वच जण पोलिसांना दोष देत सुटतात. यातूनच राजकीय कुरघोडीलाही ऊत येतो. मात्र, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस, शासकीय यंत्रणेसोबतच नागरिक म्हणून आपलीही आहे. बलात्काऱ्यांना कायद्याच्या चौकटीतूनच कठोर शिक्षा झाली पाहिजे. हैदराबादमधील घटनेतील आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केले म्हणून आता देशात अशा घटना घडणारच नाहीत, असे समजणे भाबडेपणाचे आहे.बलात्कार हे विकृतीच्या रोगाचे महाभयंकर लक्षण आहे. त्या लक्षणाचा इलाज करून या रोगाचे मूळ नष्ट केले पाहिजे, असे महिला सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्त्या वारंवार याकडे लक्ष वेधतात. सरकारने या कार्यकर्त्यांच्या सूचना गांभीर्याने घ्यायला हव्यात. तसेच, बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी देशातील कायद्यांत सुधारणा होते; मात्र अंमलबजावणीच्या नावाने बोंबच आहे. नशाखोरी, बेरोजगारी, अशिक्षितपणा आणि त्याला मिळणारी व्यसनाधीनतेची जोड यामुळे समाज विकृतीच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच बलात्कारासारखी कीड सामाजिक व्यवस्था पोखरत आहे. त्यामुळे या समस्यांवर उपाय करतानाच समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. तरच, अशा घटना कमी होतील.बलात्काराची विकृती ही असहाय स्त्रीला पाहून अचानक उफाळून येते. काही वेळेस तो ठरवूनही होतो. मात्र, काही क्षणांत केलेली कृतीची गंभीरता हे दुष्कृत्य करणाºयाच्या उशिरा लक्षात येते. आता आपल्याला कठोर शिक्षा होईल, या भीतीतून पुरावा नष्ट करण्यासाठी पीडितेची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले जाते. हैदराबाद आणि भिवंडीतील घटनेतही हाच प्रकार घडला.भिवंडीत ज्या मुलीची बलात्कार करून हत्या झाली, तिच्या वडिलांच्या घरी आरोपींची वाईट नजर होती. खाऊचे आमिष दाखवून या बालिकेला बाजूला नेऊन तिच्याशी अमानुष कृत्य करून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या आरोपींना फाशीचीच शिक्षा करावी, यासाठी मागणी होत आहे. मात्र, निष्पाप मुलीचा जीव गेला त्याचे काय? तिच्या आईवडिलांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भिवंडीसारख्या शहरात सातत्याने अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सातत्याने पालकांकडून केली जात आहे.हैदराबाद येथील दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केले. त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी एकूणच सूर पीडितेला न्याय मिळाल्याचा होता. अशा घटना थांबतील अशी त्यामागे भावना होती. मात्र, ही घटना ताजी असतानाच सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या होऊ न भिवंडी हादरली. जोपर्यंत स्त्री फक्त उपभोगाची वस्तू नाही, ही भावना समाजात निर्माण होत नाही, तोपर्यंत या घटनांना आळा बसणे शक्य होणार नाही. त्यासाठी शालेय अभ्यासक्र मातही हा विषय येणे गरजेचे आहे. विशेषत: कायद्याची कठोरता व महिलांच्या सुरक्षिततेबाबत शासनाने घेतलेले निर्णय हे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे, त्याशिवाय इथले भय संपणार नाही.

टॅग्स :Rapeबलात्कार