शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अन्यायानंतर महिला गप्प का बसतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:40 IST

अलका कुबल : मी-टू प्रकरणाबाबत ‘विचारकुंकू’ कार्यक्रमात नाराजी

ठाणे : महिलांवर अन्याय होत असेल, तर त्या इतकी वर्षे गप्प का बसतात? हाडाचे पत्रकार आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचवतात, मग तेच का गप्प बसले आहेत? मला भीती वाटत होती, हे मला पटत नाही. मेहनतीने काम करताना संयम ठेवावा. अन्याय झाला असेल तर त्या महिलांनी आठ ते १० वर्षे गप्प बसायला नको होते, अशी नाराजी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी मी-टू प्रकरणाबाबत व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्र आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थ यांच्यातर्फे मंगळवारी सहयोग मंदिर येथे ‘विचारकुंकू या कार्यक्रमात कुबल यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी घेतली. त्या म्हणाल्या की, तलवारीची धार आता बोथट झाली आहे. तुमचा कोणी हात धरला तर तो झटकू शकता किंवा वाजवू शकता. आवाज उठवा व स्वत: ठाम नकार द्या, असा सल्ला देत घटना घडताना आपण बघ्याची भूमिका घेतो, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल, तर अन्याय करणाऱ्याला ठेचून काढावे, असे त्या म्हणाल्या. अभिनय क्षेत्रात मेहनतीबरोबर नशीबही लागते. खरा टीकाकार आपल्याकडे हवा असतो, कारण त्याने आपल्या कामात सुधारणा होते. निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे,अर्चना जोगळेकर, वर्षा उसगावकर आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. काम करताना आम्ही कधीच व्यावसायिक नाते ठेवले नव्हते. त्यावेळी जिव्हाळ्याचे नाते असे. आता फक्त व्यावसायिकपणा आला आहे. हल्लीच्या अभिनेत्री फक्त कामापुरते बोलतात. समोर ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते/अभिनेत्री बसले आहेत, याचे त्यांना भान नसते. एकमेकांमधला संवाद संपला आहे. अ‍ॅटॅचमेंट नसल्यामुळे कौटुंबिक नाते आता राहिलेले नाही. कास्टिंग काऊचबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी अन्याय होत असेल तिथे बोलावे, असा कानमंत्र दिला.

अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे होत्या. दरम्यान, हिंदी साहित्यिका सुलभा कोरे, सामाजिक क्षेत्रातील वृषाली मगदूम, पत्रकार अनुपमा गुंडे, घरकाम करणाºया शोभा बांदेकर आणि सहकार क्षेत्रातील शिल्पा शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे केंद्राचे सचिव अमोल नाले यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानची उद्दिष्टे सांगितली. आभारप्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘लक्ष्मीकांत बेर्डे माणूस म्हणून चांगला’ : सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना त्या भावुक झाल्या. लक्ष्याचा कोणताही सिनेमा मी आवर्जून पाहते. लक्ष्या आपल्याला सोडून गेला, याचे वाईट वाटत आहे. माणूस म्हणून तो नेहमीच चांगला होता, असे भावोद्गार त्यांनी काढले.

टॅग्स :Metoo CampaignमीटूAlka Kubalअलका कुबल