शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आयुक्त बदलताच चांगले निर्णय का गुंडाळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 08:31 IST

फडणवीस यांच्या या योजनेत त्यांच्याकडील व त्यांच्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांकडील खात्यांनाही फारशी चमक दाखवता आलेली नाही.

- संदीप प्रधानवरिष्ठ सहायक संपादकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांना शंभर दिवसांत आपल्या कामगिरीची चमक दाखवण्याची संधी दिली. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी राज्यातील २९ महापालिकांमधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला, तर बहुतांश नागरीकरण झालेल्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अन्य जिल्हा परिषदांना मागे टाकत प्रथम क्रमांकावर नाव कोरले. शंभर दिवसांच्या कामगिरीनंतर यशस्वीतेवर नाव कोरणाऱ्या या अधिकाऱ्यांनी १०१ व्या दिवसापासून त्याच जोमाने सुरू केलेल्या योजना राबवणे सुरू ठेवले पाहिजे. अन्यथा शंभर दिवसांचा उपक्रम संपला, आता सुटलो, अशी भावना बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनात असेल, तर शंभर दिवसांचा सोहळा साजरा होऊन पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’, अशी स्थिती निर्माण होईल.

फडणवीस यांच्या या योजनेत त्यांच्याकडील व त्यांच्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांकडील खात्यांनाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. येथे महिला व बालकल्याण या तुलनेनी (पुरुष नेत्यांकडून) अस्वीकारार्ह खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तम कामगिरी केली. मुंबई, ठाणे किंवा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना अव्वल क्रमांक मिळवता आलेला नाही. याचा अर्थ उल्हासनगरसारख्या तुलनेने छोट्या शहरात किंवा ठाण्यासारख्या बहुतांश नागरीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रशासनात जेवढा झटपट बदल करणे शक्य आहे, तेवढे ते अधिक लोकसंख्या व जटील प्रश्न असलेल्या महापालिकांत जि.प.मध्ये जेमतेम शंभर दिवसांत शक्य नाही. उल्हासनगर हे शहर तर राजकीयदृष्ट्या व प्रशासनाच्या दृष्टीने बदनाम शहर आहे.  आव्हाळे यांनी अलीकडेच येथील आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. स्मार्ट पार्किंग, ऑनलाइन बांधकाम परवाने वगैरे उपक्रम राबवले. ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ घुगे यांनीही पेपरलेस कारभाराची शिस्त घालून दिली.

पोलिस आयुक्त डुंबरे यांनी मुद्देमाल हस्तांतरण, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, एकल खिडकी योजना राबवून तक्रारदारांना दिलासा दिला. हे तिन्ही अधिकारी आपापल्या पदावर किती काळ राहणार हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही.  अधिकारी तीन वर्षांसाठी त्या पदावर राहिले पाहिजेत. शिवाय या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या अशा चांगल्या योजना त्यांची बदली झाल्यानंतरही सुरू ठेवण्याचे बंधन त्यांच्यानंतर येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यावर असले पाहिजे. अनेकदा नवे आयुक्त आल्यावर जुन्या योजना, प्रकल्प वाऱ्यावर सोडून दिले जातात. सल्लागारांवर केलेला खर्च, विदेशात किंवा देशात केलेल्या दौऱ्यावरील खर्च सर्व वाया जातो. नवे आयुक्त आपले नवे निर्णय, योजना दामटतात. 

टॅग्स :thaneठाणे