शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 05:58 IST

शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यानचे पदपथ व्यापले : फेरीवाल्यांनीदेखील बळकावले रस्ते

कल्याण : रेल्वेस्थानकाकडे जाणाºया पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण होऊनही अतिक्रमण कायम आहे. एकीकडे फेरीवाल्यांनी रस्ते बळकावले असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पदपथांवर व्यापाºयांनी आपले जादा सामान थाटले आहे. त्यामुळे चालायचे कुठून आणि कसे, असा प्रश्न पादचारी विचारत आहेत.

केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी १६ रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. मात्र, केवळ कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे रुंदीकरण झाले. या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, सध्या फेरीवाल्यांनी या रस्त्यावर पुन्हा ठाण मांडले आहे. तर, व्यापाºयांनी पदपथावर आपले सामान ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाने काय साधले, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्ता रुंदीकरणाचा फटका व्यापाºयांना बसला खरा, पण पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी वाढीव बांधकामे केली. त्यात निवासी वापरासाठी असलेल्या इमारतींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी सुरू झाला. महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे या रुंदीकरणात व्यापाºयांचे चांगभले झाल्याचेही पाहावयास मिळाले.

रस्ता रुंद करताना तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु, रुंदीकरणानंतरची परिस्थिती पाहता फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्याचबरोबर व्यापाºयांनीही पदपथ व्यापल्याने रस्ता रुंदीकरणाचे फलित शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हेच चित्र डोंबिवलीतही आहे. पूर्वेतील उर्सेकरवाडी, केळकर रोड आणि पश्चिमेकडील गुप्ते रोड, दीनदयाळ मार्ग पाहता याची प्रचीती येते. उर्सेकरवाडीत फेरीवाला अतिक्रमणविरोधी कारवाई काही प्रमाणात दिसत असली तरी येथील पदपथ व्यापाºयांना आंदण दिले आहेत. हा दुजाभाव का, असा सवाल केला जात असून यावरून फेरीवाले आणि पथक यांच्यात वादाचे प्रकारही घडले आहेत.शोभेची पथके नकोत, ठोस कारवाई हवीबेकायदा व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केडीएमसीने नुकतीच प्रभागनिहाय ‘विशेष फेरीवाला पथक’ स्थापन केले आहे. हे पथक महापालिका कार्यालयीन वेळेनंतर रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे.बेकायदा विक्री करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांच्याविरोधात ही विशेष कारवाईची मोहीम उघडण्यात आली असली तरी व्यापाºयांच्या अतिक्रमणाकडे झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.अतिक्रमण कायम राहिल्यास अधिकारी आणि पथकातील कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील, असेही आयुक्त बोडके यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. मग, वस्तुस्थिती पाहता व्यापाºयांच्या अतिक्रमणाप्रकरणी कारवाईचा बडगा संबंधितांवर उगारला जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणhawkersफेरीवाले