शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 05:58 IST

शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यानचे पदपथ व्यापले : फेरीवाल्यांनीदेखील बळकावले रस्ते

कल्याण : रेल्वेस्थानकाकडे जाणाºया पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण होऊनही अतिक्रमण कायम आहे. एकीकडे फेरीवाल्यांनी रस्ते बळकावले असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पदपथांवर व्यापाºयांनी आपले जादा सामान थाटले आहे. त्यामुळे चालायचे कुठून आणि कसे, असा प्रश्न पादचारी विचारत आहेत.

केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी १६ रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. मात्र, केवळ कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे रुंदीकरण झाले. या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, सध्या फेरीवाल्यांनी या रस्त्यावर पुन्हा ठाण मांडले आहे. तर, व्यापाºयांनी पदपथावर आपले सामान ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाने काय साधले, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्ता रुंदीकरणाचा फटका व्यापाºयांना बसला खरा, पण पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी वाढीव बांधकामे केली. त्यात निवासी वापरासाठी असलेल्या इमारतींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी सुरू झाला. महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे या रुंदीकरणात व्यापाºयांचे चांगभले झाल्याचेही पाहावयास मिळाले.

रस्ता रुंद करताना तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु, रुंदीकरणानंतरची परिस्थिती पाहता फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्याचबरोबर व्यापाºयांनीही पदपथ व्यापल्याने रस्ता रुंदीकरणाचे फलित शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हेच चित्र डोंबिवलीतही आहे. पूर्वेतील उर्सेकरवाडी, केळकर रोड आणि पश्चिमेकडील गुप्ते रोड, दीनदयाळ मार्ग पाहता याची प्रचीती येते. उर्सेकरवाडीत फेरीवाला अतिक्रमणविरोधी कारवाई काही प्रमाणात दिसत असली तरी येथील पदपथ व्यापाºयांना आंदण दिले आहेत. हा दुजाभाव का, असा सवाल केला जात असून यावरून फेरीवाले आणि पथक यांच्यात वादाचे प्रकारही घडले आहेत.शोभेची पथके नकोत, ठोस कारवाई हवीबेकायदा व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केडीएमसीने नुकतीच प्रभागनिहाय ‘विशेष फेरीवाला पथक’ स्थापन केले आहे. हे पथक महापालिका कार्यालयीन वेळेनंतर रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे.बेकायदा विक्री करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांच्याविरोधात ही विशेष कारवाईची मोहीम उघडण्यात आली असली तरी व्यापाºयांच्या अतिक्रमणाकडे झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.अतिक्रमण कायम राहिल्यास अधिकारी आणि पथकातील कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील, असेही आयुक्त बोडके यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. मग, वस्तुस्थिती पाहता व्यापाºयांच्या अतिक्रमणाप्रकरणी कारवाईचा बडगा संबंधितांवर उगारला जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणhawkersफेरीवाले