शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सगळे काही सुरळीत होत असताना सामान्य प्रवाशाला जाच का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही वेळापत्रक ठरवून सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही वेळापत्रक ठरवून सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा सामान्यांच्या रेल्वे प्रवासावर गदा आली. मात्र हाच सर्वसामान्य प्रवासी खासगी क्षेत्रात काम करून घर चालवित आहे. त्याच्या खिशाला रस्ते प्रवास परवडणारा नाही. आता अनलॉकमध्ये सर्व काही खुले होत असताना सामान्य प्रवाशाच्या प्रवासावर निर्बंध कायम आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी सामान्य प्रवासी खिशात दंडाची रक्कम ठेवूनच प्रवास करीत आहे.

दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासातून कोरोना अधिक पसरू शकतो अशी भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे सामान्यांना रेल्वे प्रवासात सूट दिलेली नाही. सामान्यांना सूट दिली नसली तरी आज कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कामाला आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा बोजा आहे. कोरोनामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. अनेक कंपन्या कामगारांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देत असल्या तरी अनेक कामगारांना प्रत्यक्ष कामावर हजर राहावे लागते. रस्ते मार्गाने सरकारी बस, खासगी टॅक्सीने प्रवास करायचा म्हटला तर मुंबई गाठताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात प्रवासाचा खर्च परवडणारा नाही. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त असल्याने रेल्वे प्रवासाला सामान्यांची जास्त पसंती आहे. घरी बसले तर घर कसे चालणार, आहे ती नोकरीही हातून गेल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कोण करणार, असे विविध प्रश्न नोकरदार सामान्य प्रवासी वर्गास सतावत आहे. त्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही. त्यामुळे ते दंड भरू, पण पोटासाठी प्रवास करू या मन:स्थितीत आहे. टीसीने पकडले तर ५०० रुपये दंड भरावा लागले. मात्र महिनाभर घरी थांबून कसे चालेल. दंडाची रक्कम खिशात ठेवून सामान्य प्रवास कारवाईस न भीता प्रवास करीत आहेत. सुरुवातीला सामान्य प्रवाशांना प्रवासापासून रोखण्यासाठी कसून तपासणी केली जात होती. आता तपासणी ढिली पडली आहे. तिकीट तपासणी करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही नाही. ८० टक्के पदे भरलेली नाहीत. उपलब्ध असलेले टीसीचे मनुष्यबळ हे ७० टक्के लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जाते. त्यामुळे ३० टक्के कर्मचारी हा उपनगरी प्रवासी वर्गावर देखरेख ठेवणारा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या वतीने कारवाई केली जात आहे. सामान्य पोट नाही भरणार तर काय करणार, अशीही भावना दबक्या आवाजात कारवाई करणाऱ्या पोलिसांकडून व्यक्त केली जाते.

सामान्यांच्या व्यथा लक्षात घेता कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सामान्यांसाठी रेल्वे प्रवास सुरू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेऊन रेल्वेसेवा सुरू करावी. कोरोना काय केवळ सामान्य प्रवाशांमुळेच पसरतोय अशी सरकारची धारणा असल्यास ही धारणा चुकीची आहे. काही निर्बंध ठेवून प्रवाशाला मुभा दिली गेली पाहिजे.

----------------------------

भाजपकडून आंदोलनाचा इशारा

गेल्या रविवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर डोंबिवलीत आले होते. त्यांनीही सामान्य प्रवाशांना प्रवासी मुभा द्यावी. यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे. त्यांनी या मागणीचा विचार केला नाही तर भाजपकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. अन्य राजकीय पक्षांनीही ही मागणी उचलून धरली पाहिजे, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

--------------------------