शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

सगळे काही सुरळीत होत असताना सामान्य प्रवाशाला जाच का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही वेळापत्रक ठरवून सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही वेळापत्रक ठरवून सामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा सामान्यांच्या रेल्वे प्रवासावर गदा आली. मात्र हाच सर्वसामान्य प्रवासी खासगी क्षेत्रात काम करून घर चालवित आहे. त्याच्या खिशाला रस्ते प्रवास परवडणारा नाही. आता अनलॉकमध्ये सर्व काही खुले होत असताना सामान्य प्रवाशाच्या प्रवासावर निर्बंध कायम आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी सामान्य प्रवासी खिशात दंडाची रक्कम ठेवूनच प्रवास करीत आहे.

दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासातून कोरोना अधिक पसरू शकतो अशी भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे सामान्यांना रेल्वे प्रवासात सूट दिलेली नाही. सामान्यांना सूट दिली नसली तरी आज कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कामाला आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा बोजा आहे. कोरोनामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. अनेक कंपन्या कामगारांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देत असल्या तरी अनेक कामगारांना प्रत्यक्ष कामावर हजर राहावे लागते. रस्ते मार्गाने सरकारी बस, खासगी टॅक्सीने प्रवास करायचा म्हटला तर मुंबई गाठताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात प्रवासाचा खर्च परवडणारा नाही. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त असल्याने रेल्वे प्रवासाला सामान्यांची जास्त पसंती आहे. घरी बसले तर घर कसे चालणार, आहे ती नोकरीही हातून गेल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कोण करणार, असे विविध प्रश्न नोकरदार सामान्य प्रवासी वर्गास सतावत आहे. त्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही. त्यामुळे ते दंड भरू, पण पोटासाठी प्रवास करू या मन:स्थितीत आहे. टीसीने पकडले तर ५०० रुपये दंड भरावा लागले. मात्र महिनाभर घरी थांबून कसे चालेल. दंडाची रक्कम खिशात ठेवून सामान्य प्रवास कारवाईस न भीता प्रवास करीत आहेत. सुरुवातीला सामान्य प्रवाशांना प्रवासापासून रोखण्यासाठी कसून तपासणी केली जात होती. आता तपासणी ढिली पडली आहे. तिकीट तपासणी करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही नाही. ८० टक्के पदे भरलेली नाहीत. उपलब्ध असलेले टीसीचे मनुष्यबळ हे ७० टक्के लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जाते. त्यामुळे ३० टक्के कर्मचारी हा उपनगरी प्रवासी वर्गावर देखरेख ठेवणारा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या वतीने कारवाई केली जात आहे. सामान्य पोट नाही भरणार तर काय करणार, अशीही भावना दबक्या आवाजात कारवाई करणाऱ्या पोलिसांकडून व्यक्त केली जाते.

सामान्यांच्या व्यथा लक्षात घेता कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सामान्यांसाठी रेल्वे प्रवास सुरू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेऊन रेल्वेसेवा सुरू करावी. कोरोना काय केवळ सामान्य प्रवाशांमुळेच पसरतोय अशी सरकारची धारणा असल्यास ही धारणा चुकीची आहे. काही निर्बंध ठेवून प्रवाशाला मुभा दिली गेली पाहिजे.

----------------------------

भाजपकडून आंदोलनाचा इशारा

गेल्या रविवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर डोंबिवलीत आले होते. त्यांनीही सामान्य प्रवाशांना प्रवासी मुभा द्यावी. यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे. त्यांनी या मागणीचा विचार केला नाही तर भाजपकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. अन्य राजकीय पक्षांनीही ही मागणी उचलून धरली पाहिजे, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

--------------------------