शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'आदिवासींच्या मनात सरकारबद्दल द्वेष पसरविण्याचे हे कारस्थान कुणाचे?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 10:30 IST

मंजुरीशिवाय दुरुस्ती मसुदा बनला कसा याच्या चौकशीची पंडित यांची मागणी

ठाणे - देशातील वन हक्क जोपासणाऱ्या आदिवासींना अस्वस्थ करणारा भारतीय वन अधिनियम सुधारणा विधेयक 2019 चा मसुदा आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्या विधेयकाच्या मसुद्याने देशभरातील आदिवासींमध्ये संतापाची लाट पसरवलेली त्या मसुद्याला वन मंत्रालयाची मंजुरीच नाही असे वक्तव्य खुद्द केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री डॉ.प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशी करण्याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार करून हे मसुदा बनविणारे महाभाग कोण? याचा शोध घेण्याची मागणी पंडित यांनी केली आहे.

भारतीय वन कायदा 1927 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील वन कायदा, ज्यात काही सुधारणा करून वनावर वन कब्जेदार शेतकऱ्यांचे हक्क गोठवून वन अधिकाऱ्यांना अत्यंत अमर्याद अधिकार या सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात दिले होते. भारतीय वन कायदा सुधारणा विधेयक 2019 असा मसुदा सार्वजनिक करण्यात आला होता. यात आदिवासींचे वनाचे हक्क हिरावून उद्योजकांना वन राखायला देण्याबाबतही तरतूद होती. 2006 चा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क अधिनियम या कायद्याने आदिवासींना वनाचा हक्क मिळाला मात्र या सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात या 2006 च्या कायद्याला हरताळ फासण्याचा प्रकार दिसत होता,परिणाम आदिवासींमध्ये प्रचंड संताप होता. याबाबत लाखांचे मोर्चे काढून आदिवासींनी आपला सरकारवरील संताप व्यक्त केला.

या मसुद्यात सुधारणेसाठी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या, स्वतः आम्हीही सूचना केल्याचे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र जेव्हा पर्यावरण आणि वनमंत्री डॉ.प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

आदिवासी कष्टकऱ्यांना सरकारच्या विरोधात उभे राहण्यास कारण बनलेला हा मसुदा अखेर कुणाची निर्मिती आहे याचा शोध घेतला पाहिजे असे विवेक पंडित यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पंडित यांनी याबाबत केंद्राशी चर्चा करून या मसुदा प्रकरणात नक्की कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी पंडित यांनी केली आहे. तसेच आदिवासी वनहक्क धारकांवर कोणताही अन्याय आम्ही होऊ देणार नाही, आणि हे सरकार असा अन्याय करणार नाही असा विश्वास आहे असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस