शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

'आदिवासींच्या मनात सरकारबद्दल द्वेष पसरविण्याचे हे कारस्थान कुणाचे?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 10:30 IST

मंजुरीशिवाय दुरुस्ती मसुदा बनला कसा याच्या चौकशीची पंडित यांची मागणी

ठाणे - देशातील वन हक्क जोपासणाऱ्या आदिवासींना अस्वस्थ करणारा भारतीय वन अधिनियम सुधारणा विधेयक 2019 चा मसुदा आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्या विधेयकाच्या मसुद्याने देशभरातील आदिवासींमध्ये संतापाची लाट पसरवलेली त्या मसुद्याला वन मंत्रालयाची मंजुरीच नाही असे वक्तव्य खुद्द केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री डॉ.प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशी करण्याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार करून हे मसुदा बनविणारे महाभाग कोण? याचा शोध घेण्याची मागणी पंडित यांनी केली आहे.

भारतीय वन कायदा 1927 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील वन कायदा, ज्यात काही सुधारणा करून वनावर वन कब्जेदार शेतकऱ्यांचे हक्क गोठवून वन अधिकाऱ्यांना अत्यंत अमर्याद अधिकार या सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात दिले होते. भारतीय वन कायदा सुधारणा विधेयक 2019 असा मसुदा सार्वजनिक करण्यात आला होता. यात आदिवासींचे वनाचे हक्क हिरावून उद्योजकांना वन राखायला देण्याबाबतही तरतूद होती. 2006 चा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क अधिनियम या कायद्याने आदिवासींना वनाचा हक्क मिळाला मात्र या सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात या 2006 च्या कायद्याला हरताळ फासण्याचा प्रकार दिसत होता,परिणाम आदिवासींमध्ये प्रचंड संताप होता. याबाबत लाखांचे मोर्चे काढून आदिवासींनी आपला सरकारवरील संताप व्यक्त केला.

या मसुद्यात सुधारणेसाठी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या, स्वतः आम्हीही सूचना केल्याचे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र जेव्हा पर्यावरण आणि वनमंत्री डॉ.प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

आदिवासी कष्टकऱ्यांना सरकारच्या विरोधात उभे राहण्यास कारण बनलेला हा मसुदा अखेर कुणाची निर्मिती आहे याचा शोध घेतला पाहिजे असे विवेक पंडित यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पंडित यांनी याबाबत केंद्राशी चर्चा करून या मसुदा प्रकरणात नक्की कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी पंडित यांनी केली आहे. तसेच आदिवासी वनहक्क धारकांवर कोणताही अन्याय आम्ही होऊ देणार नाही, आणि हे सरकार असा अन्याय करणार नाही असा विश्वास आहे असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस