शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

दुरंगी लढतीत ठाण्यात हवा कोणाची, भाजप की मनसेची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 00:15 IST

प्रचार अंतिम टप्प्यात : वाहतूककोंडीसह पुनर्विकासाचा प्रश्न

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली असून आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मराठीचा मुद्दा, गुजराती-मराठी वाद, त्यानंतर क्लस्टर, रस्ते, वाहतूककोंडी, अरुंद रस्ते, पाणी, जुन्या इमारतींचा प्रश्न या प्रमुख मुद्यांवरून सध्या या मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असले तरी खरी लढत ही भाजपचे संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात होत आहे. अविनाश जाधव यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागली, तेव्हापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. तर, संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली. सुरुवातीला केळकर यांच्या नावाला काहीसा विरोध होता. शिवसेनेतील काही मंडळीदेखील नाराज होती. परंतु, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने राष्टÑवादीने आपला उमेदवार मागे घेऊन थेट मनसेला टाळी दिली आहे. त्यामुळे राष्टÑवादीच्या मतांचा फायदा मनसेला मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु, ती किती असतील, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून या दोनही उमेदवारांनी प्रचाररॅली, चौकसभा, बाइकरॅली आदींवर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. परंतु, आता आॅक्टोबर हीट वाढत असल्याने सकाळच्या प्रचाराऐवजी सायंकाळच्या प्रचारावर अधिकचा भर दिला जात आहे. रॅलीला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांचे कुठे औक्षण होताना दिसत आहे, तर कुठे समस्यांचा पाढा वाचला जात आहे. नौपाडा भागात जुन्या इमारतींचा प्रश्न, घोडबंदरच्या काही भागात पाण्याची समस्या, कुठे वाहतूककोंडी, तर कुठे रस्त्यांची झालेली दुरवस्था अशा विविध मुद्यांवरून मतदारराजाही या दोन्ही उमेदवारांना आठवण करून देत आहे. तर, शहरातील वाहतूककोंडी दूर करण्याबरोबरच स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडून काढण्याचे आश्वासन अविनाश जाधव यांच्याकडून दिले जात आहे.सर्वकाही मतदारांना आकर्षित करण्यासाठीदरम्यान, सकाळीच प्रचाराला सुरुवात होत असून कुठे टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेताना अविनाश जाधव दिसत होते, तर कुठे भाजपचे उमेदवार संजय केळकर हे मॉर्निंग वॉक करून क्रिकेटचा खेळ खेळताना दिसले आहेत. एकूणच, मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता हे दोन प्रमुख उमेदवार वाट्टेल ते करण्याच्या तयारीत आले आहेत. त्यामुळे चाय पे चर्चा म्हणत मतदारांनी मतांचे चौकार, षटकार मारावे, असे तर या दोघांना म्हणायचे नसेल ना, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :thane-acठाणे शहर