शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणाचे खासगीकरण कुणाच्या हिताचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:24 IST

मुंब्रा, कळव्यातील रहिवाशांचा सवाल : वीज वितरणाच्या खासगीकरणास ग्राहकांचा विरोध

जितेंद्र कालेकर 

ठाणे : कळवा, मुंब्रा परिसरातील वीजगळती आणि वीजचोरी रोखण्यासाठी तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भिवंडीच्या धर्तीवर खासगीकरणातून वीजपुरवठा करण्याची राज्य सरकारची योजना असली, तरी या भागातील बहुतांश नागरिकांनी या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी तर खासगीकरण झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मुंब्रा आणि कौसा भागातील विजेची थकबाकी, गळती तसेच चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात आता विजेचे वितरण खासगी कंपनीमार्फत करण्याची घोषणा महावितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ठाण्यात केली. सदोष मीटर बदलण्याबरोबर ते पुरवणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकणे तसेच येत्या तीन महिन्यांत खासगीकरण करून वीजगळतीवर मार्ग काढण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. यावर कळवा, मुंब्रा भागांतील स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील म्हणाले, झोपडपट्टी परिसरात वीजचोरीचे प्रकार अधिक आहेत. या भागातील लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण कळवा, मुंब्रावासीयांवर खासगीकरणाचा भुर्दंड कशाला? खासगी वीज आणि मीटरचे दर अधिक आहेत. त्यामुळेच खासगीकरणाला विरोध आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर आठ ते दहा दिवसांतच जनआंदोलन उभारले जाईल, असेही ते म्हणाले. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचेही त्यांनी आवाहन केले आहे. यात ज्या पक्षाकडून प्रतिसाद दिला जाणार नाही, त्यांना निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खासगीकरण कोणासाठी, याचे दलाल कोण, असे सवाल त्यांनी केले. खासगीकरणातून येथील ग्राहकांवर अन्याय होणार आहे. ज्या परिसरातून वीजगळती किंवा चोरी होत असेल, तेवढ्याच भागापुरते खासगीकरण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

खारीगाव, पारसिकनगर येथील प्रा. श्रीरंग कुडूक म्हणाले, खासगीकरणाची आताच का गरज वाटली? जे वीजबिलाचा भरणा करत नसतील, त्यांच्यावर कारवाई केली जावी. वीजचोरी रोखली पाहिजे. पण, खासगीकरण हा त्यासाठी पर्याय नाही. सरकारचाही महसूल वाढला पाहिजे, असेही प्रा. कुडूक म्हणाले.

कळव्याच्या जय सेवालाल कामगार सेवा संघटनेचे अध्यक्ष रूपसिंग राठोड म्हणाले, खासगीकरणामुळे ग्राहकांना त्रास होणार आहे. सध्या झोपडपट्टी भागातच १२०० ते १५०० रुपयांपर्यंत बिल येते. खासगीकरणामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार आहे. सध्या काही घरे १५०० रुपये भाड्याने आहेत. त्यापेक्षा अधिक वीजबिल आल्यास कामगार वस्तीतील रहिवाशांना ते परवडणारे नाही.

खासगीकरणातून ग्राहकांना फायदा होणार नाही. वितरकाची मनमानी वाढून सरकारचे त्यावर नियंत्रण राहणार नाही. त्यामुळेच लोकहितासाठी खासगीकरणाला ठाम विरोध असल्याचे राष्टÑवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मंदार केणी म्हणाले. मुंब्रा येथील रहिवासी आणि राकाँचे पदाधिकारी रफीक शेख म्हणाले, खासगीकरणात अनेक त्रुटी आहेत. खासगी वीज खूप महाग आहे. राष्ट्रवादीचा याला विरोध आहे.खासगीकरण असावेचयाउलट, खासगीकरण केलेच पाहिजे, असे परखड मत कळवा, खारेगाव येथील प्रवीण भालेकर यांनी व्यक्त केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून वीजचोरी थांबणार आहे. दिवा, कळवा, मुंब्रा आणि शीळ या भागातील वाढत्या वीजमागणीलाही त्या माध्यमातून पर्याय उपलब्ध होईल. त्याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे. प्रामाणिक ग्राहकांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याचा दावाही भालेकर यांनी केला आहे.

टॅग्स :mumbraमुंब्रा