शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

प्लास्टिक पिशव्यांना बंदी असताना भिवंडीत राजरोसपणे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 21:12 IST

भिवंडी : राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यातील सोनाळे गावातील प्लास्टिक कंपनीवर आज बुधवारी दुपारी छापा टाकून तब्बल तीन टन पिशव्यासह कच्चा माल ...

ठळक मुद्देदोन कंपनीत राजरोसपणे पिशव्याचे उत्पादनतीन टन पिशव्यासह कच्चा माल जप्तप्रदूषण नियंत्रण विभागाचा परवाना नाही

भिवंडी: राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यातील सोनाळे गावातील प्लास्टिक कंपनीवर आज बुधवारी दुपारी छापा टाकून तब्बल तीन टन पिशव्यासह कच्चा माल प्रदुषण विभागाने जप्त केला.तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राजराजेश्वरी बजाज कंपाऊण्ड येथे निशांत जैन यांची मे.चिंटू प्लास्टिक व सागर जैतावकर यांची मनोरमा इंटरप्रायझेस या प्लास्टिक पिशव्या तयार करण्याच्या कंपन्या सुरू होत्या. शासनाने पन्नास मायक्रोनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या उत्पादनास बंदी केली असताना या दोन्ही कंपनीत राजरोसपणे पिशव्याचे उत्पादन सुरू होते. या पिशव्या किरकोळ दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडे उपलब्ध दिसुन येत होत्या. याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. पोलीसांनी खात्री करून या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाला माहिती दिली. या दुपारी प्रदुषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शरद पवार व तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विलास चौघुले यांनी आपल्या पथकासह संयुक्त कारवाई केली. सोनाळे येथील अनाधिकृत सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा कंपनीवर छापा टाकून कंपनीतून तीन हजार किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल प्रदूषण विभागाने जप्त केला. तसेच या कंपनीकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचा कोणताही परवाना नसल्याची माहिती प्रदूषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शरद पवार यांनी दिली. पुढील कारवाई प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून होणार असुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कंपनी मालकांवर फौजदारी कारवाई व्हावी,अशी मागणी शहरातील पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPlastic banप्लॅस्टिक बंदी