शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्लास्टिक पिशव्यांना बंदी असताना भिवंडीत राजरोसपणे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 21:12 IST

भिवंडी : राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यातील सोनाळे गावातील प्लास्टिक कंपनीवर आज बुधवारी दुपारी छापा टाकून तब्बल तीन टन पिशव्यासह कच्चा माल ...

ठळक मुद्देदोन कंपनीत राजरोसपणे पिशव्याचे उत्पादनतीन टन पिशव्यासह कच्चा माल जप्तप्रदूषण नियंत्रण विभागाचा परवाना नाही

भिवंडी: राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यातील सोनाळे गावातील प्लास्टिक कंपनीवर आज बुधवारी दुपारी छापा टाकून तब्बल तीन टन पिशव्यासह कच्चा माल प्रदुषण विभागाने जप्त केला.तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राजराजेश्वरी बजाज कंपाऊण्ड येथे निशांत जैन यांची मे.चिंटू प्लास्टिक व सागर जैतावकर यांची मनोरमा इंटरप्रायझेस या प्लास्टिक पिशव्या तयार करण्याच्या कंपन्या सुरू होत्या. शासनाने पन्नास मायक्रोनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या उत्पादनास बंदी केली असताना या दोन्ही कंपनीत राजरोसपणे पिशव्याचे उत्पादन सुरू होते. या पिशव्या किरकोळ दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडे उपलब्ध दिसुन येत होत्या. याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. पोलीसांनी खात्री करून या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाला माहिती दिली. या दुपारी प्रदुषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शरद पवार व तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विलास चौघुले यांनी आपल्या पथकासह संयुक्त कारवाई केली. सोनाळे येथील अनाधिकृत सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा कंपनीवर छापा टाकून कंपनीतून तीन हजार किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल प्रदूषण विभागाने जप्त केला. तसेच या कंपनीकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचा कोणताही परवाना नसल्याची माहिती प्रदूषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शरद पवार यांनी दिली. पुढील कारवाई प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून होणार असुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कंपनी मालकांवर फौजदारी कारवाई व्हावी,अशी मागणी शहरातील पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPlastic banप्लॅस्टिक बंदी