शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

मीरारोडमध्ये मीटर डाऊन असताना भाईंदरमध्ये मात्र रिक्षा चालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 21:48 IST

प्रादेशिक परिवहन अन् वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रवाश्यांची लूट 

मीरारोड -  मीरारोड मध्ये रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे घेत असताना भाईंदर मध्ये आजही रिक्षा चालक हे कायदे - नियमांना तसेच प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना न जुमानता मीटर प्रमाणे भाडे घेण्यास नकार देत आहेत . मीटर प्रमाणे भाडे कमी होत असल्याने रिक्षा चालक मात्र मनमानी स्पेशल भाडे नावाखाली प्रवाश्यांची लूट करत आहेत . 

कायद्याने मीटर प्रमाणे भाडे स्वीकारणे रिक्षा चालकांना बंधनकारक आहे . रिक्षा चालकाने कोणत्याही प्रवाशास त्याच्या इच्छित स्थळी सोडले पाहिजे . मीटर  प्रमाणे भाडे न स्वीकारणाऱ्या रिक्षा चालकावर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस कारवाई यांनी सातत्याने कारवाई करणे आवश्यक आहे . त्यांनी स्वतःहून अश्या प्रकारांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे . परंतु ह्या दोन्ही यंत्रणा जाणीवपूर्वक मीटर प्रमाणे भाडे याची अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आले आहेत . त्यामुळे रिक्षा चालकांच्या मनमानी भाडे वसुलीला ह्या यंत्रणांची मोकळीक असण्या मागे अर्थपूर्ण कारण नाकारता येत नाही . 

सध्या मीटर प्रमाणे किमान भाडे हे २१ रुपये इतके आहे . परंतु भाईंदर मध्ये मात्र पूर्व - पश्चिम तसेच थेट मुर्धा ते उत्तन - पाली पर्यंत कुठेही रिक्षा चालक हे मीटर प्रमाणे भाडे घेऊन जायला तयार नाहीत . या भागातील रिक्षा चालक हे सर्रास मीटर प्रमाणे भाडे नेण्यास नकार देतात. भाईंदर मध्ये मीटर पद्धतच नसल्याचे मोठ्या ठसक्यात सांगून सेपरेट जायचे तर स्पेशल भाडे म्हणून वाट्टेल ती रक्कम सांगून प्रवाश्यांची लूट करतात .  प्रवासी देखील वाद नको म्हणून नाईलाजाने मागेल ते भाडे देऊन प्रवास करतात . किमान भाडे २१ रुपये असताना स्पेशल भाडे सांगून किमान ३० ते ४५ रुपये उकळले जातात . 

भाईंदर स्थानक पासून नवघर - गोडदेव किंवा भाईंदर पोलीस ठाणे वा फाटक जायचे म्हटल्यास स्पेशल भाडे म्हणून २१ ऐवजी ३० रुपये घेतले जातात . भाईंदर पूर्व वरून भाईंदर पश्चिमेस जायचे सांगितले तर स्पेशल भाडे म्हणून थेट ६० रुपये वा त्यापेक्षा जास्त सांगितले जातात . मॅक्सस पर्यंत थेट ४५ ते ५० रुपये सांगतात . उत्तन ला तर १५० रुपयेच्या आसपास भाडे घेतले जाते . भाईंदर पूर्वेला क्रीडा संकुल व इंद्रलोक पर्यंत ४५ ते ६० रुपये घेतले जातात .  

अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नाही . आरटीओ, वाहतूक पोलीस आदीं कडून स्वतःहून ठोस कारवाई केली जात नसतानाच दुसरीकडे राजकारणी आणि लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नी मूग गिळून बसतात . जेणे करून मनमानी भाड्याच्या वसुली विरोधात प्रवासी हतबलता व्यक्त करतात . दुसरीकडे काही रिक्षा चालकांना विचारणा केली असता मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास आमची तयारी आहे . पण रिक्षा संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांचा आणि काही रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास विरोध असल्याचे सांगितले जाते.  परंतु मीटर प्रमाणे चला सांगितले तर रिक्षा चालक मात्र सरळ नकार देतात  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर