शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर मराठी पोरांना नोकरीसाठी गुजरातला जावे लागले; जितेंद्र आव्हाडांची टीका 

By अजित मांडके | Updated: April 15, 2024 18:00 IST

गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला जातात. तर मराठी पोरांना रोजगार मिळणार कुठून आता आपल्या पोरांना नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून गुजरातला जावे लागलं, अशी टीका  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करत, भारतात ८३ टक्के लोक बेरोजगार आहे. भारताचा विकासदर ४ पेक्षा खाली जाईल आणि तो गेला तर आपली परिस्थिती ही पाकिस्तान आणि श्रीलंका पेक्षा वाईटच असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल, बिहार सगळीकडेच नाराजी आहेत. तर मग येवढ्या जागा आणणार कुठून पाकिस्तान मधून का? अशी बोचरी टीका करत, मोदी सरकारला डिवचण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. तर, गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

ठाण्यात सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक रोजगार मेळावे लागतात, ऑन ट्रेनी आणि अप्रेंटीसमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. असे सांगितले जाते. यावरून लोकांना येड बनवणं हेच यांचं काम असल्याचे दिसत आहे अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लोकांना आशा दाखवल्या. त्याचे काय झालं ते सांगा. तसेच दहा वर्षात दिलेली वचने किती पूर्ण केली ते सांगा. असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे.

दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर - आव्हाड

गुंडांचे फोन येतात. हे शंभर टक्के खरं आहे. ते गुंड कोण आहेत, कोणत्या गॅंगचे आहेत,त्यांच्यावर किती मर्डर केसेस आहेत. किती गुन्हे आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर केला जात आहे . आमदार रोहित पवार जे बोलले त्यात एक शब्दही खोटा नाही. असेही आव्हाडांनी यावेळी सांगितले.

गोडावूनवर जी कारवाई झाली ती १०० टक्के चुकीची आहे. उच्च न्यायालयाची स्टे आॅर्डर असतांना देखील कारवाई झाली आहे. त्या विरोधात मी कोर्टात गेलो आहे. दोन ते तीन दिवसात त्या संदर्भातील निर्णय येणे अपेक्षित असल्याचे मत भिवंडी लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हात्रे हे जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तीन दिवसापूर्वी देखील एक रस्ता तोडला, सीसी असून देखील वन खात्याकडून कारवाई केली गेली. अधिकाºयांवर देखील दबाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भिवंडी शरद पवार आणि उध्दव ठाकरे मिळून तीन सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी कपील पाटील यांनी भिवंडीत केवळ टक्केवारीचे राजकारण केले असून एवढ्या वर्षात त्यांनी येथील लोकांसाठी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निलेश सांबरे यांनी लढण्याचे संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही. मात्र अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत ही एकाच विचारांची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड