शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

...तर मराठी पोरांना नोकरीसाठी गुजरातला जावे लागले; जितेंद्र आव्हाडांची टीका 

By अजित मांडके | Updated: April 15, 2024 18:00 IST

गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला जातात. तर मराठी पोरांना रोजगार मिळणार कुठून आता आपल्या पोरांना नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून गुजरातला जावे लागलं, अशी टीका  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करत, भारतात ८३ टक्के लोक बेरोजगार आहे. भारताचा विकासदर ४ पेक्षा खाली जाईल आणि तो गेला तर आपली परिस्थिती ही पाकिस्तान आणि श्रीलंका पेक्षा वाईटच असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल, बिहार सगळीकडेच नाराजी आहेत. तर मग येवढ्या जागा आणणार कुठून पाकिस्तान मधून का? अशी बोचरी टीका करत, मोदी सरकारला डिवचण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. तर, गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

ठाण्यात सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक रोजगार मेळावे लागतात, ऑन ट्रेनी आणि अप्रेंटीसमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. असे सांगितले जाते. यावरून लोकांना येड बनवणं हेच यांचं काम असल्याचे दिसत आहे अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लोकांना आशा दाखवल्या. त्याचे काय झालं ते सांगा. तसेच दहा वर्षात दिलेली वचने किती पूर्ण केली ते सांगा. असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे.

दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर - आव्हाड

गुंडांचे फोन येतात. हे शंभर टक्के खरं आहे. ते गुंड कोण आहेत, कोणत्या गॅंगचे आहेत,त्यांच्यावर किती मर्डर केसेस आहेत. किती गुन्हे आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर केला जात आहे . आमदार रोहित पवार जे बोलले त्यात एक शब्दही खोटा नाही. असेही आव्हाडांनी यावेळी सांगितले.

गोडावूनवर जी कारवाई झाली ती १०० टक्के चुकीची आहे. उच्च न्यायालयाची स्टे आॅर्डर असतांना देखील कारवाई झाली आहे. त्या विरोधात मी कोर्टात गेलो आहे. दोन ते तीन दिवसात त्या संदर्भातील निर्णय येणे अपेक्षित असल्याचे मत भिवंडी लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हात्रे हे जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तीन दिवसापूर्वी देखील एक रस्ता तोडला, सीसी असून देखील वन खात्याकडून कारवाई केली गेली. अधिकाºयांवर देखील दबाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भिवंडी शरद पवार आणि उध्दव ठाकरे मिळून तीन सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी कपील पाटील यांनी भिवंडीत केवळ टक्केवारीचे राजकारण केले असून एवढ्या वर्षात त्यांनी येथील लोकांसाठी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निलेश सांबरे यांनी लढण्याचे संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही. मात्र अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत ही एकाच विचारांची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड