शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

युती टिकवायची की नाही, ते शिवसेनेच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:32 IST

शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही

ठाणे : शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही, याचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विकासाची माहिती देताना बुधवारी ते बोलत होते.पेट्रोल, डिझेलचे वाढणारे भाव ही चिंतेची बाब आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी कर कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हे दर वाढले म्हणून महागाई वाढली, असा निष्कर्ष सरसकट काढता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्य सरकारांनी कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईचा दर हा ९.८ टक्के एवढा होता. तोच दर आता ४.२८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे त्या सरकारच्या कारभाराशी तुलना करता सध्या महागाई आटोक्यात असल्याचा दावा सहस्रबुद्धे यांनी यावेळी केला.मागील चार वर्षांत भाजपा सरकारने केवळ हायवे, रस्ते विकास यावरच भर दिलेला नाही, तर तळागाळातील नागरिकांचा विकास करण्यावर अधिक भर दिल्याची माहिती त्यांनी दिली.आधारकार्डची जरी सक्ती वाटत असली, तरीदेखील त्या माहितीचा फायदाच झाला असून त्यामुळे ५० हजार कोटी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात करदात्यांची संख्या तीन कोटी ८६ लाख एवढी होती. आता हाच आकडा दुप्पट होऊन सहा कोटी ८३ लाखांच्या घरात गेल्याकडेही सहस्रबुद्धे यांनी लक्ष वेधले.बुलेट ट्रेनबाबत काही राजकीय मंडळींकडून दिशाभूल केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांची मने वळवली जातील आणि त्यांच्या मतानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. सुरुवातीला कोणत्याही नव्या प्रकल्पाला विरोध हा होतच असतो. परंतु, नंतर तो मावळतो. त्यामुळे बुलेट ट्रेनचा विरोधदेखील मावळेल, अशी आशा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.