शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

युती टिकवायची की नाही, ते शिवसेनेच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:32 IST

शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही

ठाणे : शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही, याचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विकासाची माहिती देताना बुधवारी ते बोलत होते.पेट्रोल, डिझेलचे वाढणारे भाव ही चिंतेची बाब आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी कर कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हे दर वाढले म्हणून महागाई वाढली, असा निष्कर्ष सरसकट काढता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्य सरकारांनी कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईचा दर हा ९.८ टक्के एवढा होता. तोच दर आता ४.२८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे त्या सरकारच्या कारभाराशी तुलना करता सध्या महागाई आटोक्यात असल्याचा दावा सहस्रबुद्धे यांनी यावेळी केला.मागील चार वर्षांत भाजपा सरकारने केवळ हायवे, रस्ते विकास यावरच भर दिलेला नाही, तर तळागाळातील नागरिकांचा विकास करण्यावर अधिक भर दिल्याची माहिती त्यांनी दिली.आधारकार्डची जरी सक्ती वाटत असली, तरीदेखील त्या माहितीचा फायदाच झाला असून त्यामुळे ५० हजार कोटी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात करदात्यांची संख्या तीन कोटी ८६ लाख एवढी होती. आता हाच आकडा दुप्पट होऊन सहा कोटी ८३ लाखांच्या घरात गेल्याकडेही सहस्रबुद्धे यांनी लक्ष वेधले.बुलेट ट्रेनबाबत काही राजकीय मंडळींकडून दिशाभूल केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांची मने वळवली जातील आणि त्यांच्या मतानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. सुरुवातीला कोणत्याही नव्या प्रकल्पाला विरोध हा होतच असतो. परंतु, नंतर तो मावळतो. त्यामुळे बुलेट ट्रेनचा विरोधदेखील मावळेल, अशी आशा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.