शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिथे पालकांची जागरुकता नाही तिथे भिस्त शिक्षकांवर - डॉ. कमलादेवी आवटे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 3, 2024 20:04 IST

पालक जिथे जागरुक नाही तिथे मुलांच्या शिक्षणाची सगळी भिस्त शिक्षकांवर असते.

ठाणे: पुर्व प्राथमिक शिक्षकांचे काम अवघड, कठिण असते. त्या वयात मुलांना समजून घ्यावे लागते. पालक जिथे जागरुक नाही तिथे मुलांच्या शिक्षणाची सगळी भिस्त शिक्षकांवर असते. एक पिढी या शिक्षकांच्या हातात असते. प्रत्येक पालकांचे स्वप्न असते त्याच्या मुलाने नावलौकीक मिळवावा आणि हे स्वप्न फुलवण्याचे काम शिक्षकांचे असते असे मत भाषाविभागाच्या उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी व्यक्त केले.

सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने शनिवारी ‘निपुण भारत अभियान’ ध्येये आणि पायाभूत साक्षरता - संख्याज्ञान सजगता कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आवटे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक, त्यांच्या पत्नी मनीषा टिळक, सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, सुमीता दिघे, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ‘निपुण भारत अभियान’ विषयी सांगताना डॉ. आवटे म्हणाल्या की, पुर्व प्राथमिकची तीन वर्षे आणि पहीली आणि दुसरी इयत्तेला भाषा आणि अंकश्सास्त्रावर जोड दिला आहे. तिसरीपर्यंत मातृभाषेतच मुलांना शिक्षण द्यावे नाहीतर त्यांचा गोंधळ उडो. मुले लहान वयात भाषा शिकतात आणि ते पुढे निपुण होतात. या अभियानात जुन्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने मांडल्या आहेत. पुर्व प्राथमिक विभाग मुख्य प्रवाहात आणले आहे. बालवाड्यांमध्ये समानता आली आहे. पुढच्या शिक्षणासाठी हे उपयोगी असून मुलांचा पाया पक्का होतो असे त्या म्हणाल्या. याला अनुसरुन आज शाळेत अंक, भाषा, कौशल्य आणि खेळ याचे प्रदर्शन तीन वर्गात लावण्यात आले होते.

टॅग्स :thaneठाणे