शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जिथे पालकांची जागरुकता नाही तिथे भिस्त शिक्षकांवर - डॉ. कमलादेवी आवटे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 3, 2024 20:04 IST

पालक जिथे जागरुक नाही तिथे मुलांच्या शिक्षणाची सगळी भिस्त शिक्षकांवर असते.

ठाणे: पुर्व प्राथमिक शिक्षकांचे काम अवघड, कठिण असते. त्या वयात मुलांना समजून घ्यावे लागते. पालक जिथे जागरुक नाही तिथे मुलांच्या शिक्षणाची सगळी भिस्त शिक्षकांवर असते. एक पिढी या शिक्षकांच्या हातात असते. प्रत्येक पालकांचे स्वप्न असते त्याच्या मुलाने नावलौकीक मिळवावा आणि हे स्वप्न फुलवण्याचे काम शिक्षकांचे असते असे मत भाषाविभागाच्या उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी व्यक्त केले.

सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने शनिवारी ‘निपुण भारत अभियान’ ध्येये आणि पायाभूत साक्षरता - संख्याज्ञान सजगता कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आवटे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक, त्यांच्या पत्नी मनीषा टिळक, सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, सुमीता दिघे, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ‘निपुण भारत अभियान’ विषयी सांगताना डॉ. आवटे म्हणाल्या की, पुर्व प्राथमिकची तीन वर्षे आणि पहीली आणि दुसरी इयत्तेला भाषा आणि अंकश्सास्त्रावर जोड दिला आहे. तिसरीपर्यंत मातृभाषेतच मुलांना शिक्षण द्यावे नाहीतर त्यांचा गोंधळ उडो. मुले लहान वयात भाषा शिकतात आणि ते पुढे निपुण होतात. या अभियानात जुन्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने मांडल्या आहेत. पुर्व प्राथमिक विभाग मुख्य प्रवाहात आणले आहे. बालवाड्यांमध्ये समानता आली आहे. पुढच्या शिक्षणासाठी हे उपयोगी असून मुलांचा पाया पक्का होतो असे त्या म्हणाल्या. याला अनुसरुन आज शाळेत अंक, भाषा, कौशल्य आणि खेळ याचे प्रदर्शन तीन वर्गात लावण्यात आले होते.

टॅग्स :thaneठाणे