शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

केडीएमटीच्या बस ठेवायच्या तरी कुठे?; रस्त्यावर बस उभ्या केल्याने पार्टची होतेय चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:50 IST

कल्याण : बसचालक आणि वाहकांची कमतरता आणि उत्पन्न-खर्चातील वाढती तफावत, यामुळे गणेशघाट आणि वसंत व्हॅली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ...

कल्याण : बसचालक आणि वाहकांची कमतरता आणि उत्पन्न-खर्चातील वाढती तफावत, यामुळे गणेशघाट आणि वसंत व्हॅली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे आगारात केडीएमटीच्या ११६ बस धूळखात पडल्या आहेत. परिणामी, सध्या चालू असलेल्या बस ठेवण्यासाठी आगारात जागा उरलेली नाही. त्याचा फटका बसच्या सुरक्षेला बसला असून, रस्त्यावर उभ्या केलेल्या बसचे पार्ट चोरीला जाऊ लागले आहेत.

केडीएमटीच्या ताफ्यात पूर्वीच्या १०० व जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारांतील ११८ अशा एकूण २१८ बस आहेत. यापैकी दोन बस अपघातग्रस्त झाल्याने सध्या २१६ बस उपक्रमाच्या ताफ्यात आहेत. परंतु, बसचे आयुर्मान, आगारातील उपलब्ध मूलभूत सोयीसुविधा, आयुर्मान ओलांडलेल्या जुन्या बसच्या दुरुस्तीसाठी येणारा वाढीव खर्च, दिवसागणिक प्रवासीसंख्येत होणारी घट, यामुळे वाढत जाणारी संचालन तूट पाहता उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे चित्र आहे.

२१८ बसचा ताफा असला, तरी सध्या ७० बसच रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बस या आगारांमध्ये धूळखात पडल्या असून, यात आगारातील जास्तीतजास्त जागा या बसगाड्यांनी व्यापली आहे. यात ४७ भंगार बससह लिलावासाठी प्रस्तावित असलेल्या ६९ बसचा समावेश आहे.

गणेशघाट आगारातूनच सध्या सर्व बसचे संचालन केले जात आहे. परंतु, त्यात केडीएमसीने या आगारातील दोन गुंठे जागेत अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. परिणामी, संचालन सुरू असलेल्या बस आगारात उभ्या करण्यासाठी जागा राहिलेली नाही. हीच अवस्था वसंत व्हॅली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे आगाराची आहे. तर, डोंबिवलीतील खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या करण्यात येतात. २००५ च्या महापुरात गणेशघाट आगारातील बसगाड्यांचे मोठे नुकसान झाले होते.

त्यावेळच्या बस आजही भंगार अवस्थेत आहेत. यात इंजीन घोटाळ्यातील बसचाही समावेश आहे. यातील पाच बसवर घोटाळ्याचा ठपका असताना ४७ पैकी ४२ बस अद्यापही आगारात का खितपत ठेवल्या आहेत, असाही सवाल एकूणच वास्तव पाहता उपस्थित होत आहे. तसेच वाहक आणि चालकांची कमतरता आणि उत्पन्न आणि खर्चातील वाढती तफावत पाहता ६९ बसगाड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. याला परिवहन समितीची मान्यताही मिळाली आहे. महापौर विनीता राणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी या बसगाड्यांची पाहणीही केली होती. परंतु, अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने या बसही आगारात धूळखात पडल्या आहेत.

आगारात आता बस उभ्या करण्यासाठी जागाच न उरल्याने चालू स्थितीतील बस आगाराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. यात बसचे पार्ट चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गणेशघाट आगाराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या केलेल्या बसच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असली तरी रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया बसची सुरक्षा धोक्यात आली आहे. आधीच उपक्रमाची अवस्था बिकट असताना आता बसगाड्यांचे पार्ट सुरक्षेअभावी चोरीला जाऊ लागल्याने उपक्रमाची चिंता अधिक वाढली आहे.

जागा नाही ही वस्तुस्थिती

जुन्या बसगाड्यांमधील भंगारातील बस असो अथवा लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या बसचा मुद्दा असो, याबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने त्या गाड्या जैसे थे आगारात उभ्या आहेत. त्यामुळे चालू अवस्थेतील बस जागेअभावी आगाराच्या बाहेर उभ्या कराव्या लागत आहेत. याबाबत केडीएमसीतील पदाधिकारी आणि अधिकाºयांची भेट घेऊन निश्चित तोडगा काढला जाईल, असे केडीएमसीचे परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेBus Driverबसचालक