शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ठाकुर्लीच्या मंगलकलशमधील भाजीमंडई सुरु कधी होणार?रहिवाश्यांना हवीय सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 20:26 IST

ठाकुर्लीतील मंगलकलश सोसाटयीमधील एका इमारतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेची सुमारे ३हजार स्क्वेअर फूटाची जागा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या जागा सोसायटीने महापालिकेला भाजीमंडईसाठी दिली होती. तसे आराखड्यात मंजूर करण्यात आले होते. मात्र इमारत बांधल्यापासून आतापर्यंत तेथे भाजीमंडई सुरु झालेली नाही. आता तर रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई होत आहे, ही संधी असून भाजीमंडई तातडीने सुरु करावी अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.

ठळक मुद्दे फेरिवाल्यांवर कारवाई होत आहे तर इथे तरी सुविधा द्या

डोंबिवली: ठाकुर्लीतील मंगलकलश सोसाटयीमधील एका इमारतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेची सुमारे ३हजार स्क्वेअर फूटाची जागा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या जागा सोसायटीने महापालिकेला भाजीमंडईसाठी दिली होती. तसे आराखड्यात मंजूर करण्यात आले होते. मात्र इमारत बांधल्यापासून आतापर्यंत तेथे भाजीमंडई सुरु झालेली नाही. आता तर रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई होत आहे, ही संधी असून भाजीमंडई तातडीने सुरु करावी अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.येथिल रहिवासी राजू शेख यांनी सांगितले की, इमारतीच्या मुख्य भागात ही वास्तू असून बंद वास्तु धुळखात पडुन आहे. तळमजला, पहिला मजला अशी सुमारे तीन हजार स्क्वे.फूट जागा आहे. ठाकुर्लीचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे रहिवाश्यांनी भाजीबाजारासाठी स्थानक परिसरात अथवा डोंबिवलीवर अवलंबून रहावे लागते. या ठिकाणी मंडई सुरु झाल्यास त्रास वाचेल, वेळ वाचेल आणि नागरिकांचा पैसाही वाचेल. यासाठी भाजपाचे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने पत्रव्यवहार केला होता. विद्यमान नगरसेवक साई शेलार हे देखिल प्रयत्न करत आहेत, पण नेमकी अडचण कुठे आहे हे समजत नसल्याने समस्या जास्त गंभीर होत आहे.वास्तु पडून असल्याने तेथे रहिवाश्यांचे लक्ष नसते. अशाचतच उपद्रवी तेथे नागरिकांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत जातात, मद्यपान करतात. अनेकांनी त्या वास्तूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या तर काहींनी वास्तुला उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोसायटीचे स्वास्थ धोक्यात आले होते. आता सोसायटीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक आहेत, पण तरीही त्यांची नजर चुकवून काही उपद्रवी तेथे जातातच. त्यांना कसे थांबवणार. रात्रीच्या वेळी तेथे अंधार असतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापालिकेची नेमकी अडचण काय आहे हे तरी रहिवाश्यांना स्पष्ट करावे. तसेच त्या वास्तुचा ताबा घेऊन ती जागा ज्या उद्देशाने महापालिकेला मिळाली आहे त्याचा लाभ तातडीने सगळयांना द्यावा अशीही मागणी रहिवाश्यांनी केली. 

टॅग्स :thakurliठाकुर्लीdombivaliडोंबिवली