शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने सुरू होणार कधी?; पुनश्च लॉकडाऊनमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 03:34 IST

४१० कारखाने परवानगीच्या प्रतीक्षेत

मुरलीधर भवार

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका डोंबिवली एमआयडीसीतील कारखान्यांना बसला आहे. ११ मेपासून काही मोजक्याच अत्यावश्यक वस्तू, औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ४१० कंपन्यांंनी त्या सुरू करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, गुरुवारपासून पुन्हा होणाºया लॉकडाऊनमुळे या कंपन्यांची परवानगी लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, त्यामुळे कारखाने सुरू होणार तरी कधी?, असा सवाल केला जात आहे.

२४ मार्चपासून लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा तापला होता. राज्य सरकारने या कंपन्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. ३८ कंपन्या सेफ्टी आॅडिट न केल्यामुळे बंद केल्या होत्या. ५०पेक्षा जास्त कंपन्यांना २५ लाख ते एक कोटीपर्यंत दंडात्मक नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे कंपनी मालक व कामगारांनी आंदोलन केले. पुढे ते कोरोनामुळे त्यांनी मागे घेतले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद होत्या.

११ मे रोजी ४२० पैकी ६० कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली गेली. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कामगार गावी गेल्याने कारखानदारांना अपुºया मनुष्यबळाचा फटका बसला. तसेच गुजरात, मध्य प्रदेश व अन्य राज्यांतून कच्च माल येत नव्हता. त्यामुळे उत्पादन करता येत नव्हते. केवळ औषध उत्पादनाच्या कंपन्या सुरू होत्या. अनलॉक १मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील एक अधिकारी नेमून त्यांच्याकडून कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ४१० कंपन्यांच्या मालकांनी कंपन्या सुरू करण्यास परवानगी मागितली होती. ही परवानगी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. मात्र, पुन्हा केडीएमसी हद्दीत गुरुवारपासून लॉकडाऊन होत असल्याने परवानगीची प्रक्रिया रखडणार असल्याचे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.

उद्योजक श्रीकांत जोशी म्हणाले, आता कुठे सुरळीत होत होते. लॉकडाऊनमुळे कच्च माल मागविण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच ज्या कंपन्या सुरू आहेत, त्यात कामगार वाहतूक साधनेअभावी कामावर येऊ शकणार नाहीत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस