शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

स्वच्छ आॅगस्ट क्रांती ‘एक्स्प्रेस’ धावणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:52 IST

शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे.

नारायण जाधव ठाणे : शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात आॅगस्टचा पहिला आठवडा उलटला, तरी ही स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस अजून धावलेलीच नाही.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जमा होणाऱ्या घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, यासाठी नगरविकास विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याला अनेक शहरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही शहरांवर अनुदानबंदीची कुºहाड उगारूनही अद्याप त्यांनी गती पकडलेली नाही.जिल्ह्यातील सहाही महानगरे अंधारातचराज्यातील महानगरांसाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, त्यात पहिल्या आठवड्यात तरी राज्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरस्कार मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेसह एकाही महापालिका अथवा नगरपालिकेने एकही विशेष कार्यक्रम राबवलेला नाही.काय आहे स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रम?स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपरोक्त कालावधीत दैनंदिन घनकचºयापैकी ८० टक्के निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, घरोघरी जाऊन १०० टक्के कचºयाचे संकलन व वाहतूक करणे, वर्गीकरण केलेल्या कचºयावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अहवाल रोज नेमलेल्या प्रशासन अधिकाºयास पाठवावा. प्रशासन अधिकाºयाने प्रत्यक्ष पाहणी करून तो अहवाल विभागीय उपसंचालक किंवा विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. ज्या नगरपालिका या काळात उद्दिष्टपूर्ती करतील, त्यांना देण्यात येणाºया रस्ता अनुदानासह वैशिष्ट्यपूर्ण अनुदाने देण्याबाबत विचार केला जाईल.जिल्ह्यात कचराकोंडीसंपूर्ण देश २०१८ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने देशभर २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी, भुसावळ यासारख्या शहरांनी उल्लेखनीय कामगिरी करून स्वच्छतेची पारितोषिके पटकावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाहवा मिळवली. परंतु, राज्यातील ३८४ पैकी मोजक्या शहरांनी ही कामगिरी केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगडची पनवेल या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर, उरण, पेण, अलिबाग, खोपोली, महाड यासारखी शहरे अजून कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत चाचपडत आहेत.या शहरांतील बहुसंख्य प्रभागांत कचºयाच्या निर्मितीच्या ठिकाणी ओले आणि सुके वर्गीकरण होत नाही. त्यावर, शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. ठाणे महापालिकेने मागवलेल्या प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित कचरा विल्हेवाटीच्या कंत्राटाच्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात तर सारे कागदावरच आहे.येत्या काळात जाग येईल काय? : पहिला आठवडा संपला, तरी येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नगरविकास विभागाने दिलेल्या स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रमाची एक्स्प्रेस धावेल का, असा प्रश्न आता केला जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान