शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ आॅगस्ट क्रांती ‘एक्स्प्रेस’ धावणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:52 IST

शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे.

नारायण जाधव ठाणे : शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात आॅगस्टचा पहिला आठवडा उलटला, तरी ही स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस अजून धावलेलीच नाही.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जमा होणाऱ्या घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, यासाठी नगरविकास विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याला अनेक शहरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही शहरांवर अनुदानबंदीची कुºहाड उगारूनही अद्याप त्यांनी गती पकडलेली नाही.जिल्ह्यातील सहाही महानगरे अंधारातचराज्यातील महानगरांसाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, त्यात पहिल्या आठवड्यात तरी राज्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरस्कार मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेसह एकाही महापालिका अथवा नगरपालिकेने एकही विशेष कार्यक्रम राबवलेला नाही.काय आहे स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रम?स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपरोक्त कालावधीत दैनंदिन घनकचºयापैकी ८० टक्के निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, घरोघरी जाऊन १०० टक्के कचºयाचे संकलन व वाहतूक करणे, वर्गीकरण केलेल्या कचºयावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अहवाल रोज नेमलेल्या प्रशासन अधिकाºयास पाठवावा. प्रशासन अधिकाºयाने प्रत्यक्ष पाहणी करून तो अहवाल विभागीय उपसंचालक किंवा विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. ज्या नगरपालिका या काळात उद्दिष्टपूर्ती करतील, त्यांना देण्यात येणाºया रस्ता अनुदानासह वैशिष्ट्यपूर्ण अनुदाने देण्याबाबत विचार केला जाईल.जिल्ह्यात कचराकोंडीसंपूर्ण देश २०१८ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने देशभर २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी, भुसावळ यासारख्या शहरांनी उल्लेखनीय कामगिरी करून स्वच्छतेची पारितोषिके पटकावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाहवा मिळवली. परंतु, राज्यातील ३८४ पैकी मोजक्या शहरांनी ही कामगिरी केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगडची पनवेल या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर, उरण, पेण, अलिबाग, खोपोली, महाड यासारखी शहरे अजून कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत चाचपडत आहेत.या शहरांतील बहुसंख्य प्रभागांत कचºयाच्या निर्मितीच्या ठिकाणी ओले आणि सुके वर्गीकरण होत नाही. त्यावर, शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. ठाणे महापालिकेने मागवलेल्या प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित कचरा विल्हेवाटीच्या कंत्राटाच्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात तर सारे कागदावरच आहे.येत्या काळात जाग येईल काय? : पहिला आठवडा संपला, तरी येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नगरविकास विभागाने दिलेल्या स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रमाची एक्स्प्रेस धावेल का, असा प्रश्न आता केला जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान