शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वच्छ आॅगस्ट क्रांती ‘एक्स्प्रेस’ धावणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:52 IST

शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे.

नारायण जाधव ठाणे : शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात आॅगस्टचा पहिला आठवडा उलटला, तरी ही स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस अजून धावलेलीच नाही.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जमा होणाऱ्या घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, यासाठी नगरविकास विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याला अनेक शहरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही शहरांवर अनुदानबंदीची कुºहाड उगारूनही अद्याप त्यांनी गती पकडलेली नाही.जिल्ह्यातील सहाही महानगरे अंधारातचराज्यातील महानगरांसाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, त्यात पहिल्या आठवड्यात तरी राज्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरस्कार मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेसह एकाही महापालिका अथवा नगरपालिकेने एकही विशेष कार्यक्रम राबवलेला नाही.काय आहे स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रम?स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपरोक्त कालावधीत दैनंदिन घनकचºयापैकी ८० टक्के निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, घरोघरी जाऊन १०० टक्के कचºयाचे संकलन व वाहतूक करणे, वर्गीकरण केलेल्या कचºयावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अहवाल रोज नेमलेल्या प्रशासन अधिकाºयास पाठवावा. प्रशासन अधिकाºयाने प्रत्यक्ष पाहणी करून तो अहवाल विभागीय उपसंचालक किंवा विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. ज्या नगरपालिका या काळात उद्दिष्टपूर्ती करतील, त्यांना देण्यात येणाºया रस्ता अनुदानासह वैशिष्ट्यपूर्ण अनुदाने देण्याबाबत विचार केला जाईल.जिल्ह्यात कचराकोंडीसंपूर्ण देश २०१८ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने देशभर २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी, भुसावळ यासारख्या शहरांनी उल्लेखनीय कामगिरी करून स्वच्छतेची पारितोषिके पटकावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाहवा मिळवली. परंतु, राज्यातील ३८४ पैकी मोजक्या शहरांनी ही कामगिरी केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगडची पनवेल या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर, उरण, पेण, अलिबाग, खोपोली, महाड यासारखी शहरे अजून कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत चाचपडत आहेत.या शहरांतील बहुसंख्य प्रभागांत कचºयाच्या निर्मितीच्या ठिकाणी ओले आणि सुके वर्गीकरण होत नाही. त्यावर, शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. ठाणे महापालिकेने मागवलेल्या प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित कचरा विल्हेवाटीच्या कंत्राटाच्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात तर सारे कागदावरच आहे.येत्या काळात जाग येईल काय? : पहिला आठवडा संपला, तरी येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नगरविकास विभागाने दिलेल्या स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रमाची एक्स्प्रेस धावेल का, असा प्रश्न आता केला जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान