शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारतीची पुनर्बांधणी कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 17:25 IST

Ulhasnagar : शाळा सुरू झाल्यास मुले कुठे बसणार? असा प्रश्न उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून, आयुक्तांनी त्वरित निर्णय घेण्याचे सुचविले आहे. 

-   सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या रटाळ कारभाराचा फटका शिक्षण विभागाला बसला असून गेल्या ४ वर्षांपासून शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारत पुनर्बांधणीला मुहूर्त लागला नाही. शाळा सुरू झाल्यास मुले कुठे बसणार? असा प्रश्न उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून, आयुक्तांनी त्वरित निर्णय घेण्याचे सुचविले आहे. 

उल्हासनगर महापालिकेने जुन्या व धोकादायक झालेल्या शाळा इमारतीची पुनर्बांधणी हाती घेतली. यातून खेमानी परिसरातील शाळा क्रं-१८ व २४ या मराठी व हिंदी शाळेच्या पुनर्बांधणीला हिरवा कंदील मिळाल्यावर, शिक्षण मंडळाने सुरवातीला शेजारील एका खाजगी शाळेत दोन्ही शाळा हलविल्या. मात्र काही राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळा पुनर्बांधणीबाबत प्रश्नचिन्हे उभे केल्याने, इमारत पुनर्बांधणी गेल्या ३ वर्षा पासून रखडली आहे. तसेच महापालिकेच्या मराठी व हिंदी शाळेच्या मुलांना खाजगी शाळेकडे पुरेशी जागा नसल्याचे उघड झाल्यावर, सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली. 

अखेर परिसरातील महापालिका शाळा क्रं-३ मध्ये हिंदी शाळेतील मुलांना हलविले. तर मराठी शाळेतील मुले एका खाजगी शाळेत धडे हिरवू लागले होते. दरम्यान, कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने, मुलांना ऑनलाईन शिक्षण देत असल्याचे बोलले जात आहे. कोरोना महामारीनंतर शाळा सुरू झाल्यास, महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो मुलांना बसवायचे कुठे?. असा प्रश्न मुलांसह पालकांना पडला आहे.

महापालिकेच्या रटाळ कारभारामुळे हजारो मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून शाळा इमारत बांधणीसाठी उपमहापौर भगवान भालेराव यांनी कंबर कसली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी भालेराव यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना केली. 

इमारत बांधकाम ठेकेदारांनी सुरवातीला खाजगी शाळा प्रशासनाला महापालिका शाळेला जागा दिल्या बाबत भाडे देत होती. आता त्यांनी भाडे देणे बंद केले. महापालिका आयुक्त दोन्ही शाळेच्या इमारती बाबत का निर्णय घेत नाही. असेही विचारले जात आहे. 

हजारो मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारात महापालिका आयुक्त यांनी हजारो मुलांच्या शिक्षणाचा विचार करून, शाळा इमारत पुनर्बांधणीला मंजुरी देण्याची मागणी होत आहे. असे न झाल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्हे उभे राहणार आहे. शिक्षण विभागाचे उपायुक्त विकास चव्हाण, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एस मोहिते, शिक्षण मंडळाच्या अधिकारी नीलम कदम आदीनाही शाळा पुनर्बांधणी त्वरित होण्याची शक्यता वर्तविली. 

टॅग्स :Schoolशाळाulhasnagarउल्हासनगर