शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ठाण्याच्या धर्तीवर कल्याण, डोंबिवलीत कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पालकमंत्री पाहणी करतात. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जाते. ठाण्यापेक्षा जास्त कल्याण डोंबिववली रस्त्यावर ...

कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पालकमंत्री पाहणी करतात. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जाते. ठाण्यापेक्षा जास्त कल्याण डोंबिववली रस्त्यावर खड्डे आहेत. कल्याण डोंबिवलीतील अधिकाऱ्यांच्या विरोधात कधी कारवाई केली जाणार, असा संतप्त सवाल भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी रविवारी केला. खड्डे प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

दोन वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी गेले होते. त्यानंतरही खड्डे भरले जात नाहीत. रस्ते भरण्याच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही दरवर्षी पावसाळ्य़ात खड्ड्यांचा प्रश्न कायम असतो. केवळ कल्याण डोंबिवलीत नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. इतकेच नाही तर कल्याण शीळफाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. त्यावर खड्डे दिसत नसले तरी गाडी आदळत जाते. त्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई केली गेली पाहिजे. मलवाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेने ४५० कोटी रुपये खड्ड्यांत घालविले आहेत. एकही काम झालेले नाही. सिग्नल यंत्रणेसाठी १६० कोटी रुपये खर्च केले होते. ती सुद्धा सुरू नाही. याची चौकशी झाली पाहिजे. ठाण्याच्या धर्तीवर कारवाई झाली पाहिजे.

दरम्यान, भाजप आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापेक्षा रस्ते कॉंक्रिटचे केले तर त्याचा फायदा नागरिकांना होईल. त्यासाठी पैसे देण्याची जबाबदारी शासनाची आहे, असेही ते म्हणाले.

-------------------------------------------------------