शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर असताना सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचाच आधार - विश्वजीत कदम

By नितीन पंडित | Updated: August 16, 2023 17:52 IST

मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते.

भिवंडी: देशात व राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपाने खिंडार पाडले यातून राज्यात भाजपचीही ताकद कमी असल्याचे सिद्ध झाले असून अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य जनतेला काँग्रेस हाच एकमेव आधार वाटत आहे असे वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केले बुधवारी केले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते.

काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा समन्वयक राजेश शर्मा, माजी खासदार सुरेश टावरे,माजी आमदार रशीद ताहीर, प्रदेश पदाधिकारी राजन भोसले,शेतकरी आघाडीचे पराग पष्टे,राणी अग्रवाल, काँग्रेस माथाडी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष छगन पाटील,काँग्रेस पदाधिकारी राकेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.       आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत.२०१४ पासून भाजपाने जनतेची पिळवणूक सुरू केली आहे. खोटी आश्वासने, महागाई,बेरोजगारी यामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेस काळातील अनेक लोकोपयोगी कायद्यात बदल करून श्रीमंतांना फायदा पोहोचवण्याचे काम भाजपाने केले आहे. मणिपूर सारख्या दुर्दैवी घटनेकडे मोदी सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. 

भाजपाची स्वतःची राजकीय ताकद नसल्यामुळे त्यांनी नऊ राज्यातील विविध पक्षांचे सरकार पाडण्याचे काम केले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे चांगले काम सुरु असताना केंद्रातील भाजपाने सोयीचे राजकारण करत शिवसेना आणि त्या पाठोपात राष्ट्रवादीत फूट पाडली.ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती मोदींनी टीका केली मात्र अवघ्या तीन दिवसात चित्र बदलले आणि राज्यात राष्ट्रवादीला सोबत घेतले आणि मोदींना आपले टिकेचे शब्द गिळून घ्यावे लागले अशी टीका देखील कदम यांनी यावेळी केली.         राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा जगात झाली आणि त्यामुळेच काँग्रेस आज संपूर्ण ताकतीने देशात उभा राहत आहे.भिवंडी लोकसभा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे.या ठिकाणी काँग्रेसला पोषक वातावरण आहे त्यामुळे काँग्रेसला स्वतंत्र लढावे लागले तर भिवंडीत काय परिस्थिती आहे त्याची चाचणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार असून लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्याचा अहवाल आपण पक्षश्रेष्ठींना सोपविणार असल्याचे मत यावेळी विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदम