शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर असताना सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचाच आधार - विश्वजीत कदम

By नितीन पंडित | Updated: August 16, 2023 17:52 IST

मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते.

भिवंडी: देशात व राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपाने खिंडार पाडले यातून राज्यात भाजपचीही ताकद कमी असल्याचे सिद्ध झाले असून अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य जनतेला काँग्रेस हाच एकमेव आधार वाटत आहे असे वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केले बुधवारी केले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते.

काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा समन्वयक राजेश शर्मा, माजी खासदार सुरेश टावरे,माजी आमदार रशीद ताहीर, प्रदेश पदाधिकारी राजन भोसले,शेतकरी आघाडीचे पराग पष्टे,राणी अग्रवाल, काँग्रेस माथाडी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष छगन पाटील,काँग्रेस पदाधिकारी राकेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.       आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत.२०१४ पासून भाजपाने जनतेची पिळवणूक सुरू केली आहे. खोटी आश्वासने, महागाई,बेरोजगारी यामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेस काळातील अनेक लोकोपयोगी कायद्यात बदल करून श्रीमंतांना फायदा पोहोचवण्याचे काम भाजपाने केले आहे. मणिपूर सारख्या दुर्दैवी घटनेकडे मोदी सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. 

भाजपाची स्वतःची राजकीय ताकद नसल्यामुळे त्यांनी नऊ राज्यातील विविध पक्षांचे सरकार पाडण्याचे काम केले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे चांगले काम सुरु असताना केंद्रातील भाजपाने सोयीचे राजकारण करत शिवसेना आणि त्या पाठोपात राष्ट्रवादीत फूट पाडली.ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती मोदींनी टीका केली मात्र अवघ्या तीन दिवसात चित्र बदलले आणि राज्यात राष्ट्रवादीला सोबत घेतले आणि मोदींना आपले टिकेचे शब्द गिळून घ्यावे लागले अशी टीका देखील कदम यांनी यावेळी केली.         राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा जगात झाली आणि त्यामुळेच काँग्रेस आज संपूर्ण ताकतीने देशात उभा राहत आहे.भिवंडी लोकसभा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे.या ठिकाणी काँग्रेसला पोषक वातावरण आहे त्यामुळे काँग्रेसला स्वतंत्र लढावे लागले तर भिवंडीत काय परिस्थिती आहे त्याची चाचणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार असून लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्याचा अहवाल आपण पक्षश्रेष्ठींना सोपविणार असल्याचे मत यावेळी विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदम