शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मुरबाडमध्ये भातखरेदी काट्याला मुहूर्त केव्हा?; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:33 IST

व्यापाऱ्यांकडून कमी भाव 

मुरबाड :  मुरबाड तालुक्यातील भातपिकाला यंदा पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे कर्जाचा डाेंगर असलेल्या शेतकऱ्यांना आधारभूत खरेदी केंद्रे सुरू झाल्यावर आधार मिळेल, अशी आशा आहे. मात्र, खाजगी व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करून गेले तरी अद्याप आदिवासी विकास महामंडळाच्या भातखरेदी केंद्राच्या काट्याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ दूधनोली व माळ या दोन आदिवासी सेवा सहकारी संस्थांमार्फत भातखरेदी केंद्र सुरू करते. तर, मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघही शासनाने ठरवून दिलेल्या भावानुसार भातखरेदी करतो. खरेदी-विक्री संघाने मुरबाड येथे केंद्र सुरू केले आहे. 

या ठिकाणी परिसरातील शेतकरी भातविक्रीसाठी आणतात, मात्र टोकावडे ते माळशेजघाट, बांडेशेत, वेळुक या परिसरातील शेतकरी ५० किमी अंतरावर असलेल्या मुरबाडला भात नेऊ शकत नाहीत. त्यांच्या सोयीचे केंद्र माळ आणि धसई ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरू केली जातात. ही दोन भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मेहनतीने पिकवलेला भात धसई, सरळगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. 

शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून हाेणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा जास्त दिवस अंत न पाहता आदिवासी विकास महामंडळाला हमीभावाने भातखरेदी करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप ठाणे जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष संतोष भांगरथ यांनी केली आहे.

‘अडीच ते तीन हजार हमीभाव द्या’अवकाळी पावसामुळे भातपिकाची नासाडी झाली असली, तरी हाती आलेल्या भातपिकाची विक्री करूनच दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. शासनाने फक्त १८६८ रुपये भाव क्विंटलला जाहीर केला आहे. एक क्विंटल भाताचे पीक घेण्यासाठी कमीतकमी दोन हजारच्या पुढचा खर्च येत आहे. निदान, शासनाने अडीच ते तीन हजार रुपये दर भाताला दिला, तर शेतकरी चिंतामुक्त होईल, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी