शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला समितीची बैठक होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:41 IST

सदस्यांची सरकारकडे तक्रार : दर १५ दिवसांनी भेटण्याचा झाला होता निर्णय

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरण-२००९ नुसार गेल्या वर्षी शहर फेरीवाला समिती स्थापन केली. पाच महिन्यांपूर्वी तिच्या पहिल्या बैठकीत दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेण्याचे समितीचे अध्यक्ष व आयुक्त बालाजी खतगावकर यांनी ठरवले होते. मात्र, पाच महिन्यांत एकही बैठक न झाल्याने समिती सदस्य माधवी गायकवाड यांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता समितीची बैठक फेरीवाला सर्वेक्षणानंतरच केली जाईल, असे उत्तर समाजविकास विभागाकडून देण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

पालिकेने दोन वर्षांपूर्वी पहिली शहर फेरीवाला समिती स्थापन केली होती. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली नसतानाच पालिकेने समिती स्थापन करण्याची घाई केल्याने उच्च न्यायालयाने ती रद्द करण्याचे आदेश पालिकेला दिले. पालिकेने स्थापन केलेली समिती त्यावेळी त्वरित बरखास्त केली. तसेच फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी कंपनीची नियुक्तीही न्यायालयाने रद्दबातल ठरवल्याने गेल्या वर्षी पालिकेने नवीन ३० सदस्यांची समिती स्थापन केली. तीही सत्ताधारी भाजपाच्या आग्रहाखातर बरखास्त करण्याचा प्रयत्न दरम्यानच्या काळात झाला.

समितीत सत्ताधाऱ्यांचा एकही सदस्य नसल्याने समिती नियंत्रणबाह्य ठरणार असल्याची भीती त्यांना वाटली होती. त्यांनी समिती बरखास्तीचा ठरावही तत्कालीन महासभेत मान्यतेसाठी आणला होता. त्याला सदस्यांनी न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याने बिथरलेल्या प्रशासनाने स्थापन केलेली समिती बरखास्त करता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे समितीची बरखास्ती तूर्तास टळली असली, तरी त्यावर सत्ताधाऱ्यांचेच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

समितीची पहिली बैठक ६ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. त्यात आयुक्तांनी दर १५ दिवसांनी समितीची आढावा बैठक घेण्याचे सूतोवाच केले होते. त्याचवेळी त्यांनी फेरीवाला धोरणाचा आधार घेत समितीवर महापौर डिम्पल मेहता यांचे वर्चस्व निर्माण केले.फेरीवाल्यांना सामावताना दुजाभावप्रशासनाने मीरा रोडच्या हाटकेश व रामदेव पार्कमध्ये दोन नवीन बाजार सुरू करून त्यात स्थानिक फेरीवाल्यांना सामावून घेतले. त्यातही दुजाभाव केल्याचा आरोप शिवसेना, मनसे व काँग्रेसने केला. तसेच फेरीवाल्यांवरील कारवाईसह नवीन बाजार सुरू करण्याच्या कार्यवाहीत समितीला विचारात घेतले जात नसल्याने समिती सदस्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.