शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींची पावले थिरकतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 04:50 IST

अत्रे रंगमंदिराचा पुनर्लोकार्पण सोहळा : ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गीतावर नृत्य सादर, कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणालाही दाद

कल्याण : केडीएमसीचा पस्तिसावा वर्धापन दिन रंगला तो महापालिका कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे. नगरसेविकांनी अंबामातेच्या गीतावर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले, तर महापालिकेतील कर्मचाºयांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

महापालिकेचा ३५ वा वर्धापन दिन आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आचार्य अत्रे रंगमंदिराचे पुनर्लोकार्पण महापौर विनीता राणे यांच्या हस्ते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानिमित्ताने महापालिका कर्मचाºयांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी गणेशवंदना, कथ्थक तसेच शेतकरी, आदिवासी, राजस्थानी, कोळी नृत्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. या कर्मचाºयांच्या पाठोपाठ नगरसेविका आशालता बाबर, शालिनी वायले, हर्षाली थवील, सुनीता खंडागळे, शीतल मंडारी, भारती कुमरे यांनी ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गीतावर नृत्य सादर करत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. या त्यांच्या नृत्याला भरभरून दाद मिळाली. वाहनचालक प्रकाश वाघ यांनी केलेले सादरीकरणही लक्षवेधी ठरले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय लधवा आणि प्रसाद दाणी यांनी केले.माजी सचिवांचा विशेष सत्कार२००१ मध्ये अत्रे रंगमंदिराच्या शुभारंभप्रसंगी सादर झालेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग’ या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलावंत व केडीएमसीचे माजी सचिव चंद्रकांत माने आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतील कलावंत कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांचा यावेळी शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.उत्तम सुविधांसाठी प्रयत्नशीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मार्ट सिटीच्या योजनेत राहण्यायोग्य शहरांमध्ये देशातील पहिल्या १०० शहरांत कल्याण-डोंबिवलीचा पन्नासावा, तर महाराष्ट्रात दहावा क्र मांक आला, हे प्रशंसनीय आहे. कल्याण स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करून तेथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत, अशी माहिती देताना नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांना उत्तम नागरी सुविधा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.देखभालीची कामे एनजीओंना द्यावीतशहरांचा विकास साधताना तेथील भौगोलिक व सांस्कृतिक बाजूंचा अभ्यास करून विकास साधावयास पाहिजे. कल्याण-डोंबिवली शहरांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला महापालिका क्षेत्राचा विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी वेळीच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सभापती राहुल दामले यांनी दिले. अत्रे रंगमंदिर आणि अन्य वास्तूंची देखभाल करण्याची कामे एनजीओ यांना द्यावीत, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.समन्वयातून विकासकामे कराच्नागरिकांना उत्तम प्रकारच्या नागरी सुविधा मिळण्यासाठी प्रशासन आणि शासन या दोन्ही घटकांनी समन्वय साधून एकत्रितरीत्या विकासकामे करावीत, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. विकासकामांना चालना देण्यासाठी पीपीपीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. ते पुढे म्हणाले की, रंगमंदिराचे नूतनीकरण केल्याने त्याला नवसंजीवनी मिळून नवी झळाळी मिळाली आहे.च्याबद्दल त्यांनी प्रशासन, कंत्राटदार, पत्रकार, नगरसेवक व पदाधिकाºयांना धन्यवाद दिले. माझा राजकीय प्रवास याच रंगमंदिरापासून झाला. माझे खासदारकीचे तिकीट याच ठिकाणी घोषित झाले, त्यावेळी मी माझे पहिले भाषण इथेच केले. आज माझ्याच हातून पुनर्लोकार्पण होत आहे, ही अभिमानाची आणि योगायोगाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले.हा माझ्यासाठी भाग्याचा क्षणहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराचे पुनर्लोकार्पण माझ्या हातून होत असल्याने हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते, अशा शब्दांत महापौर विनीता राणे यांनी भावना व्यक्त केल्या. सांस्कृतिक क्षेत्रात रंगभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असून नाट्यकलाकार व नाट्यरसिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. याचबरोबर नागरिकांना उत्तम मूलभूत सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे