शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण

By सदानंद नाईक | Updated: January 12, 2024 18:21 IST

भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

उल्हासनगर : एमएमआरडीएने मंजूर केलेल्या ७ रस्त्या व्यतिरिक्त इतरही रस्ते खोदून भुयारी गटार पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त लागत नसल्याने धूळ व वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून एमएमआरडीएने मंजूर केलेल्या एकून ७ रस्त्यावर भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरूवातील महापालिकेने सुरू केले. या मुख्य रस्ता व्यतिरिक्त इतर रस्ते खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

या धुळीने शहर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. तसेच खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. धुळीवर पाण्याचा फवारे मारण्याचे काम महापालिका करीत असून त्याला मर्यादा पडली आहे. 

शहरात सुरू असलेली ४२३ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजना ब्ल्यूपिंट शिवाय सुरू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुन्या भुयारी गटार पाईप पेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकले जात असल्याने, भविष्यात योजना फसण्याची शक्यता विविध राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आरोप-प्रत्यारोप मध्ये सापडलेली भुयारी गटार योजने बाबत आयुक्त अजीज शेख हे सविस्तर माहिती देत नसल्याने, योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असून त्यापैकी एकाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेचे प्रमुख म्हणून खोदलेले रस्ते दुरस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देऊन नागरिकांची धुळ व वाहतूक कोंडीतून सुटका करावी. अशी मागणीही होत आहे.

रस्ता खोदल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी रस्ता खोडल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र मुख्य ७ रस्ते खोदून काही महिने झाले असून अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तसेच इतर रस्त्याचीही तीच अवस्था आहे. बुडगेच्या हटविण्याच्या मागणीनेही जोर पकडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे