शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण

By सदानंद नाईक | Updated: January 12, 2024 18:21 IST

भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

उल्हासनगर : एमएमआरडीएने मंजूर केलेल्या ७ रस्त्या व्यतिरिक्त इतरही रस्ते खोदून भुयारी गटार पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त लागत नसल्याने धूळ व वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून एमएमआरडीएने मंजूर केलेल्या एकून ७ रस्त्यावर भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरूवातील महापालिकेने सुरू केले. या मुख्य रस्ता व्यतिरिक्त इतर रस्ते खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

या धुळीने शहर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. तसेच खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. धुळीवर पाण्याचा फवारे मारण्याचे काम महापालिका करीत असून त्याला मर्यादा पडली आहे. 

शहरात सुरू असलेली ४२३ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजना ब्ल्यूपिंट शिवाय सुरू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुन्या भुयारी गटार पाईप पेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकले जात असल्याने, भविष्यात योजना फसण्याची शक्यता विविध राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आरोप-प्रत्यारोप मध्ये सापडलेली भुयारी गटार योजने बाबत आयुक्त अजीज शेख हे सविस्तर माहिती देत नसल्याने, योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असून त्यापैकी एकाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेचे प्रमुख म्हणून खोदलेले रस्ते दुरस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देऊन नागरिकांची धुळ व वाहतूक कोंडीतून सुटका करावी. अशी मागणीही होत आहे.

रस्ता खोदल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी रस्ता खोडल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र मुख्य ७ रस्ते खोदून काही महिने झाले असून अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तसेच इतर रस्त्याचीही तीच अवस्था आहे. बुडगेच्या हटविण्याच्या मागणीनेही जोर पकडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे