शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण

By सदानंद नाईक | Updated: January 12, 2024 18:21 IST

भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

उल्हासनगर : एमएमआरडीएने मंजूर केलेल्या ७ रस्त्या व्यतिरिक्त इतरही रस्ते खोदून भुयारी गटार पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त लागत नसल्याने धूळ व वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून एमएमआरडीएने मंजूर केलेल्या एकून ७ रस्त्यावर भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरूवातील महापालिकेने सुरू केले. या मुख्य रस्ता व्यतिरिक्त इतर रस्ते खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

या धुळीने शहर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. तसेच खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. धुळीवर पाण्याचा फवारे मारण्याचे काम महापालिका करीत असून त्याला मर्यादा पडली आहे. 

शहरात सुरू असलेली ४२३ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजना ब्ल्यूपिंट शिवाय सुरू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुन्या भुयारी गटार पाईप पेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकले जात असल्याने, भविष्यात योजना फसण्याची शक्यता विविध राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आरोप-प्रत्यारोप मध्ये सापडलेली भुयारी गटार योजने बाबत आयुक्त अजीज शेख हे सविस्तर माहिती देत नसल्याने, योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असून त्यापैकी एकाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेचे प्रमुख म्हणून खोदलेले रस्ते दुरस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देऊन नागरिकांची धुळ व वाहतूक कोंडीतून सुटका करावी. अशी मागणीही होत आहे.

रस्ता खोदल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी रस्ता खोडल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र मुख्य ७ रस्ते खोदून काही महिने झाले असून अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तसेच इतर रस्त्याचीही तीच अवस्था आहे. बुडगेच्या हटविण्याच्या मागणीनेही जोर पकडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे