शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

सौर उर्जेवर पाणी तापणार कधी?

By admin | Updated: December 12, 2015 01:38 IST

इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका

मीरा रोड : इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका मात्र सर्रास सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत दाखले देत आहे . अशा खोट्या नाहरकत दाखल्यावर अधिकाऱ्यांचे खिसे मात्र गरम होत आहेत . सौरऊर्जेचा वापरच होत नसल्याने इंधन व वीज बचतीचा शासनाचा हेतू सपशेल अपयशी ठरला आहे. मीरा भार्इंदर नगरपालिका असल्यापासून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये रु ग्णालय , शाळा, महाविद्यालय , हॉस्टेल , हॉटेल, प्रयोगशाळा, कॅन्टीन आदीच्या इमारतीं मध्ये सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले कालांतराने शासनाने सर्वच इमारतींना सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बंधनकारक केल्याने मीरा भार्इंदर महापालिकेने देखील २००७ पासून बांधकाम परवानगी देताना सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याची अट टाकली . निवासी इमारतीत प्रत्येक सदनिकेस दररोज १००लिटर गरम पाणी मिळेल अश्या क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे विकासकास बंधनकारक केले. भोगवटा दाखला घेण्याआधी पालिकेच्या बांधकाम विभागा कडून सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते . सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याच्या दाखल्यांवर २००८-०९ पासून भोगवटा दाखले देण्यास सुरुवात झाली. तेव्हा पासून २०१५पर्यंत बांधकाम विभागाच्या नाहरकत दाखल्यावर तब्बल ४५०भोगवटा दाखले नगररचना विभागाने दिले आहेत . परंतु बहुतांशी इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वितच नसल्याची धक्कादायक माहिती आहे . निवासी इमारतीवर प्रती सदनिका १०० लिटर प्रमाणे त्या क्षमते नुसार सौर ऊर्जा यंत्रणा गच्चीवर उभारणे आवश्यक आहे . परंतु प्रत्यक्षात खानापूर्ती केली जाते . शिवाय प्रत्येक सदनिकेस गरम पाण्यासाठी स्वतंत्र जोडणी देणे आवश्यक असताना अश्या जोडण्याच दिल्या जात नाहीत . निवासी इमारत व अन्य इमारती मध्ये प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे पाणी येते का ? क्षमतेनुसार यंत्रणा उभारली आहे का ? या महत्वाच्या बाबी तपासल्याच जात नाहीत . सौर ऊर्जेची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने सदनिका धारकांना खर्चिक गिझर वा इंधनाचा वापर करावा लागतो .