शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सौर उर्जेवर पाणी तापणार कधी?

By admin | Updated: December 12, 2015 01:38 IST

इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका

मीरा रोड : इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका मात्र सर्रास सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत दाखले देत आहे . अशा खोट्या नाहरकत दाखल्यावर अधिकाऱ्यांचे खिसे मात्र गरम होत आहेत . सौरऊर्जेचा वापरच होत नसल्याने इंधन व वीज बचतीचा शासनाचा हेतू सपशेल अपयशी ठरला आहे. मीरा भार्इंदर नगरपालिका असल्यापासून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये रु ग्णालय , शाळा, महाविद्यालय , हॉस्टेल , हॉटेल, प्रयोगशाळा, कॅन्टीन आदीच्या इमारतीं मध्ये सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले कालांतराने शासनाने सर्वच इमारतींना सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बंधनकारक केल्याने मीरा भार्इंदर महापालिकेने देखील २००७ पासून बांधकाम परवानगी देताना सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याची अट टाकली . निवासी इमारतीत प्रत्येक सदनिकेस दररोज १००लिटर गरम पाणी मिळेल अश्या क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे विकासकास बंधनकारक केले. भोगवटा दाखला घेण्याआधी पालिकेच्या बांधकाम विभागा कडून सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते . सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याच्या दाखल्यांवर २००८-०९ पासून भोगवटा दाखले देण्यास सुरुवात झाली. तेव्हा पासून २०१५पर्यंत बांधकाम विभागाच्या नाहरकत दाखल्यावर तब्बल ४५०भोगवटा दाखले नगररचना विभागाने दिले आहेत . परंतु बहुतांशी इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वितच नसल्याची धक्कादायक माहिती आहे . निवासी इमारतीवर प्रती सदनिका १०० लिटर प्रमाणे त्या क्षमते नुसार सौर ऊर्जा यंत्रणा गच्चीवर उभारणे आवश्यक आहे . परंतु प्रत्यक्षात खानापूर्ती केली जाते . शिवाय प्रत्येक सदनिकेस गरम पाण्यासाठी स्वतंत्र जोडणी देणे आवश्यक असताना अश्या जोडण्याच दिल्या जात नाहीत . निवासी इमारत व अन्य इमारती मध्ये प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे पाणी येते का ? क्षमतेनुसार यंत्रणा उभारली आहे का ? या महत्वाच्या बाबी तपासल्याच जात नाहीत . सौर ऊर्जेची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने सदनिका धारकांना खर्चिक गिझर वा इंधनाचा वापर करावा लागतो .