शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

ठाकुर्ली भाजी मंडईला मुहूर्त कधी? वापराविना धूळखात : ‘मंगलकलश’शेजारील वास्तूत फेरीवाल्यांना जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:43 IST

ठाकुर्ली पूर्वेतील मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी बांधलेली तीन हजार चौरस फुटांची वास्तू वापराविना धूळखात पडून आहे.

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी बांधलेली तीन हजार चौरस फुटांची वास्तू वापराविना धूळखात पडून आहे. ठाकुर्ली शहराचा वाढता विस्तार पाहता ही मंडई सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रेल्वेस्थानक परिसर व मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांना येथे स्थलांतरित केल्यास हा परिसर फेरीवालामुक्त होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी आरक्षण ठेवले होते. त्यामुळे विकासकाने सोसायटी विकसित करताना भाजी मंडई बांधून दिली. तळ अधिक एक मजली अशी तीन हजार चौरस फुटांची वास्तू अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे, अशी माहिती रहिवासी राजू शेख यांनी दिली. ठाकुर्लीचा विस्तार झपाट्याने होत आहे. असे असतानाही रहिवाशांना भाजीखरेदीसाठी ठाकुर्लीतील बँक परिसर, रेल्वेस्थानक परिसरातील मुख्य बाजारपेठ अथवा डोंबिवलीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ठाकुर्लीतील मंडई सुरू करण्याची मागणी होत आहे. एकाच वास्तूच्या मंडईत भाजीविक्री सुरू झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. नागरिकांचा डोंबिवलीपर्यंत जाण्याचा वेळ आणि त्रासही वाचेल. तसेच ठाकुर्ली फेरीवालामुक्त होण्यास मदत होईल. ठाकुर्लीतील समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरातही मंडई बांधण्याचीही मागणी जोर धरत आहे.ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसरात मंडई उभारण्यासाठी भाजपाचे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने पत्रव्यवहार केला होता. विद्यमान नगरसेवक साई शेलार हे देखील प्रयत्न करत आहेत. पण, नेमकी अडचण कुठे आहे, हे समजत नसल्याने समस्या जास्त गंभीर होत आहे.उपद्रवींचा त्रास -मंडईची वास्तू पडून असल्याने तेथे रहिवाशांचे लक्ष नसते. त्याचा फायदा उपद्रवी व्यक्तींकडून घेतला जात आहे. रात्रीच्या वेळी तेथील अंधाराचा फायदा मद्यपी घेतात. अनेकांनी त्या वास्तूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. काहींनी वास्तूमध्ये उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोसायटीची सुरक्षा धोक्यात आली होती. आता सोसायटीत पूर्णवेळ सुरक्षारक्षक आहेत, पण तरीही त्यांची नजर चुकवून काही उपद्रवी तेथे जातातच. त्यांना कसे थांबवणार. रात्रीच्या वेळी अंधारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मंडई सुरू करण्यामागील नेमकी अडचण काय आहे, हे तरी महापालिकेने स्पष्ट करावे. भाजी मंडईसाठी इमारत उभारल्याने त्याचा त्यासाठीच वापर व्हावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.