शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काय केले?; राज्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:31 IST

आयुक्तांना पाठवलेल्या पत्रावर ‘फेरीवाला संघर्ष’चा सवाल

डोंबिवली : फेरीवाल्यांच्या हाणामारीप्रकरणी राज्यमंत्री व नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र लिहून कारवाईची मागणी केली असताना दुसरीकडे चव्हाण यांच्या या भूमिकेचा फेरीवाला संघर्ष समितीने निषेध केला आहे. कारवाई करण्याची भाषा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी पाच वर्षे फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काय केले?, असा सवाल संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केला आहे.

फेरीवाल्यांच्या दोन गटांत सोमवारी हाणामारी झाल्यानंतर केडीएमसीने बुधवारपासून रेल्वेस्थानकातील १५० मीटर हद्दीत अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाईची विशेष मोहीम उघडली आहे. मात्र, चव्हाण यांनी तत्पूर्वी आयुक्तांना खरमरीत पत्र पाठवून बेकायदा फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करणे आपल्या प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण बदली करून घ्यावी हे उत्तम, अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळेच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने बुधवारी सायंकाळपासून कारवाईला प्रारंभ केला.

दुसरीकडे फेरीवाला संघर्ष समितीने मात्र चव्हाण यांची भूमिका एकाकी असल्याचा आरोप केला आहे. फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली गेली आहे, मात्र पाच वर्षे राज्यमंत्री असतानाही फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी चव्हाण यांनी काय केले? राज्यमंत्री म्हणून चव्हाण राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याच सरकारचे धोरण न राबविता के वळ कारवाईची भूमिका घेणे चुकीचे आहे.एकीकडे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, असे सरकार आदेश देते तर दुसरीकडे धोरणाची अंमलबजावणी न करता कारवाईची भाषा सुरू आहे, हा दुटप्पीपणा चव्हाण यांनी थांबवावा आणि सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष मोरे यांनी केली आहे.माझे शहर शांत राहिले पाहिजे - चव्हाणफेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम आयुक्तांचे आहे. आता जे हाणामारीचे प्रकार शहरांमध्ये घडले आहेत ते पूर्णपणे थांबले पाहिजेत. याप्रकरणी कडक कारवाई झाली पाहिजे. कोणाला नुकसान पोहोचावे आणि कोणाला फायदा व्हावा, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. डोंबिवली सारख्या सुसंस्कृत शहरात जे प्रकार घडतायत ते निंदनीय आहे. अरविंद मोरे यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझे शहर फेरीवालामुक्त असावे. शांतता राहावी आणि नागरिकांना रस्ते पदपथ चालण्यासाठी राहावेत असे माझे मत आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.तातडीने धोरण राबवा - कांबळेडोंबिवली हॉकर्स भाजीपाला फेडरेशन या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी फेरीवाला धोरणाची विनाविलंब अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. आम्ही फेरीवाला शहर समितीचे सदस्य म्हणून प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. परंतू, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढल्याचे कबूल करताना कांबळे यांनी बाहेरून व्यवसायासाठी येणाºया फेरीवाल्यांचे समर्थन केले आहे. डोंबिवलीकर व्यवसाय करण्यासाठी अन्य शहरांमध्ये जात नाहीत का?, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.फेरीवाला हा देखील एक माणूस आहे. त्यालाही पोट आहे. परंतु, केडीएमसी प्रशासन फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला जाणूनबुजून विलंब लावत असल्याकडेही मोरे यांनी लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे मोरे हे शिवसेना कल्याण पश्चिम आणि पूर्व विधासभा क्षेत्रप्रमुख आहेत.राज्यमंत्री चव्हाण हे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आहेत. दरम्यान, मोरे यांच्या वक्तव्यावर चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता फेरीवाला कारवाईवरून शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका