शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

रिक्षास्टॅण्डच्या सर्वेक्षण अहवालाचे काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांनी २२ मार्चला बोलावलेल्या बैठकीत पुन्हा सर्वेक्षण करून रिक्षास्टॅण्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांनी २२ मार्चला बोलावलेल्या बैठकीत पुन्हा सर्वेक्षण करून रिक्षास्टॅण्ड निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, २००७ ते १९ दरम्यान सातवेळा झालेल्या सर्वेक्षणाचे काय झाले? ते सगळे सर्व्हे आरटीओ अधिकारी बदलल्यानंतर धूळखात पडले आहेत. नवीन सर्वेक्षणाची अंमलबजवणी होणार असेल तरच ते सर्वेक्षण करावे, अन्यथा ते रिक्षा युनियन आणि प्रवासी यांच्या डोळ्यात केवळ धूळफेक केल्यासारखे आहे. काहतूक कोंडीच्या गंभीर स्थितीला आरटीओच जबाबदार असल्याची टीका भाजपच्या कल्याण जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी व्यक्त केली.

शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी २००७ ते १९ दरम्यान सातवेळा सर्वेक्षण करण्यात आले. तत्कालीन आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्या काळात दोनदा सर्वेक्षण झाले. आता कितीवेळा करणार? या सगळ्या सर्वेक्षणांचे अहवाल आरटीओ कार्यालयात असतील. महापालिका आयुक्त बदली झाले की पुन्हा सर्वेक्षण केले जाते. मात्र, कोंडीची मूळ समस्या सुटत नाही. उलट ती वाढत राहते, असे माळेकर म्हणाले.

ते म्हणाले, जे रिक्षास्टॅण्ड २००७ पासून प्रलंबित आहेत ते अधिकृत करावे. तसेच ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ हे धोरण पहिले बंद केले पाहिजे. ठाण्याच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीमध्ये रेल्वेस्थानक परिसरात एकच रिक्षास्टॅण्ड का होऊ शकत नाही? भाजपप्रणीत रिक्षा संघटनेची ही मागणी का प्रलंबित आहे? स्टेशन परिसरात रिक्षास्टॅण्ड, रिक्षा पार्किंग कुठे झाली पाहिजे, याबाबत आ. रवींद्र चव्हाण यांनी महापालिका, रेल्वे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस, सर्व रिक्षा संघटना यांच्याबरोबर वेळोवेळी फिरून सर्वेक्षण केले होते. त्यांच्यानंतर दोन बैठका झाल्या. तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी महापालिकेत त्याचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली होती, पण ती रद्द झाली.

दरम्यान, ससाणे असताना झालेल्या सर्वेक्षणाचा अभ्यास करून त्याची अंमलबजवणी झाल्यास वाहतूककोंडीवर लवकर तोडगा निघू शकतो किंवा जर पुन्हा सर्वेक्षण करायचेच असेल तर ते लवकर करून कोंडीवर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी माळेकर यांनी केली.

--------------