शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल?

By admin | Updated: January 24, 2017 05:45 IST

मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने

ठाणे : मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत, लवकरच ठाण्याच्या मेकओव्हरचा वचननामा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. आधीच मालमत्ता करमाफी, शाई धरण पूर्ण करणे, मोफत आरोग्यसेवा, सेंट्रल पार्क या पलीकडे शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. शिवसेनेतील एकंदरीत हालचाली पाहता भाजपाला वगळून पक्षाने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.मुंबईत युतीबाबतची बोलणी सुरु असून तीन बैठकानंतरही भाजपा १४४ जागांवर ठाम आहे. परंतु शिवसेनाही भाजपाला जादा जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच, ठाण्यातही शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत त्यानुसारच स्वत:चा वचननामा तयार केला आहे. प्रत्यक्षात तो जरी अजून प्रसिद्ध झाला नसला, तरी आता मुंबईपाठोपाठ शिवसेनेने ठाण्यातही वेगळे होण्याची तयारी सुरु केल्याचे दिसते. मुंबईत रविवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या धर्तीवर ठाणे आणि उल्हासनगरलाही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली. तसेच, आरोग्य सुरक्षाकवच योजनाही जाहीर केली. याशिवाय पारसिक चौपाटी, सेंट्रल पार्क, जलवाहतुक आदी मुद्यांना देखील त्यांनी हात घातला. याचाच अर्थ शिवसेनेने ठाण्यातही मुंबईच्या धर्तीवर युती न करता स्वबळाचा पर्याय हाती घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेना जाहीर करीत असलेल्या काही प्रकल्पांना नवा मुलामा चढवण्यात आला आहे. यातील काही प्रकल्प पालिकेचे, काही राज्य आणि केंद्राच्या सहकार्याने होणार आहेत. त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये म्हणूनच शिवसेनेने लगीनघाई केल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)