शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

‘त्या’ ८५५ बेकायदा इमारतींचे काय झाले? अवमान याचिकेची सप्टेंबरमध्ये सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:49 IST

उच्च न्यायालयाने शहरातील ८५५ अवैध बांधकामे पाडून टाकण्याचे यापूर्वी दिलेले आदेश अमलात न आल्याने हरी तनवाणी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उल्हासनगर : उच्च न्यायालयाने शहरातील ८५५ अवैध बांधकामे पाडून टाकण्याचे यापूर्वी दिलेले आदेश अमलात न आल्याने हरी तनवाणी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, आपण अलीकडेच महापालिका आयुक्तपदाची धुरा स्वीकारलेली असल्याने याबाबत भूमिका स्पष्ट करण्याकरिता मुदत द्यावी, अशी विनंती करणारे प्रतिज्ञापत्र आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सादर केल्याने न्यायालयाने ३ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.उल्हासनगरातील अवैध बांधकामप्रकरणी तनवाणी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ८५५ अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरू करताच, नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण होऊन शहरात मोर्चे, जाळपोळ, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. तत्कालीन सरकारने विस्थापितांच्या शहराला दिलासा देण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. अध्यादेशानुसार काही अटीशर्तींच्या अधीन राहून दंडात्मक कारवाईनंतर अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून अध्यादेशाचे स्वागत करण्यात आले होते.शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यात प्रस्ताव तज्ज्ञ समितीसमोर सादर करायचे होते. तब्बल ७२ हजार प्रस्ताव दाखल झाले. मात्र, अनेक त्रुटींमुळे व दंडात्मक रक्कम जास्त असल्याने, फक्त १०० बांधकामे नियमित झाली. काही बांधकामांना आर झोन नंबर देण्यात आला. दंडात्मक कारवाईतून पालिकेला साडेसात कोटींचे उत्पन्न मिळाले. मात्र, राज्य शासनाला ज्या ८५५ इमारतींच्या याचिकेवरून विशेष अध्यादेश काढावा लागला, त्या इमारतीचे काय झाले, याबाबत चित्र स्पष्ट नसल्याने याचिकाकर्ते तनवाणी यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यावर, महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.आपण आयुक्तपदाची धुरा अलीकडेच स्वीकारली असून हे प्रकरण जुने असल्याने याबाबतची तपशीलवार माहिती घेऊन प्रतिज्ञापत्र सादर करतो, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी न्यायालयास सांगितले. या इमारतींबाबत चित्र स्पष्ट नसल्याने याचिकाकर्ते तनवाणी यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर