शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात विहिरींचा आधार

By admin | Updated: March 14, 2016 01:47 IST

पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.

भार्इंदर : पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे. आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. यंदा त्यात वाढ झाली आहे. शहरासाठी पाण्याचा नवा स्रोत नसल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. या कपातीमुळे आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीतील जलसाठ्याचा वापर करण्याचा विचार प्रशासनस्तरावर सुरू झाल्यानंतर त्याला काही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्याची नितांत आवश्यकता यंदा जाणवू लागली आहे. शहरात सुमारे डझनभर सार्वजनिक विहिरी, ११ तलाव असा सहज उपलब्ध होणार जलसाठा आहे. शिवाय, मर्गाळी तलाव व चेना नदीचे अस्तित्व आहे. यातील मर्गाळी तलाव सध्या एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत गेल्याने पालिका हद्दीत असलेल्या चेना नदीतील पाणी टँकरद्वारे उपसा करून ते पिण्याखेरीज इतर वापराकरिता देण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुरेश काकाणी यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, हे पाणी उपसणे अव्यवहार्य असल्याचा फतवा काढून त्याला प्रतिसादच मिळाला नसल्याचे कारण अधिकऱ्यांनीच पुढे केल्याने ती प्रक्रिया बासनात गुंडाळली आहे. शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्या नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करण्याचे आदेश देऊनही त्याकडे आजतागायत दुर्लक्ष केले आहे. परंतु, याच विहिरी ऐन कपातीच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरत आहेत. स्टेम व एमआयडीसीने गुरुवार ते शनिवारदरम्यान शहराला पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्वच नळ कोरडे पडल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी थेट सार्वजनिक व खाजगी विहिरींकडे मोर्चा वळवून गरज भागवली. जोपर्यंत कपात लागू आहे, तोपर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्यातील पाणीकपातीच्या काळात द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.