शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

आदिवासीपाड्यांमध्ये आठवडाभर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 03:06 IST

बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात बेंडशीळ, चिकण्याचीवाडी, चिंचवली आणि चाफ्याचीवाडी या आदिवासी भागांना वादळी वाºयाचा जबरदस्त फटका बसला आहे.

अंबरनाथ : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाला जोरदार फटका बसला आहे. कोंडेश्वरजवळील आदिवासीपाड्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे काही घरे पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. येथील वीजपुरवठा ठप्प झाला असून तो सुरळीत होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात बेंडशीळ, चिकण्याचीवाडी, चिंचवली आणि चाफ्याचीवाडी या आदिवासी भागांना वादळी वाºयाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवार सायंकाळी ६ नंतर या भागात सोसाट्याच्या वाºयासह पाऊस झाल्याने त्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही आदिवासी बांधवांची घरे पूर्ण जमीनदोस्त झाली असून, अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत. या भागातील अनेक मोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत. मोठे विजेचे खांबही पावसाच्या तडाख्यात सापडले. ग्रामीण भागातील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेले वृक्ष तोडून बाजूला काढले. गुरुवारी दिवसभर ग्रामीण भागातील नागरिकांनी श्रमदानातून हे काम केले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने या भागाचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब लागणार असल्याने या भागातील नागरिकांना अंधारातच राहावे लागणार आहे. चिंचवली परिसरामध्ये १५ ते २० घरांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर, चाफ्याचीवाडी या आदिवासीपाड्यात ३५ ते ४० घरांना पावसाचा फटका बसला आहे. नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार किसन कथोरे आणि तहसीलदार जयराज देशमुख घटनास्थळी गेले होते. त्यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या ग्रामस्थांचे वादळीवाºयामुळे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. तसेच सरकारकडून त्यांना लागलीच मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.- किसन कथोरे, आमदार

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार