शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:43 IST

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : मोहोली उदंचन केंद्रातील यंत्रणा अद्याप नादुरुस्त

टिटवाळा : कल्याण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केडीएमसीचे मोहिली उदंचन केंद्र पाणीखाली गेले होते. त्यामुळे या केंद्रांतून तसेच मोहने सबपंप हाउसमधून कल्याण-डोंबिवली शहरांना दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. रविवार सायंकाळनंतर कल्याण-डोंबिवलीचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, केडीएमसीतील भाग असलेल्या टिटवाळा शहर आणि परिसराला चार दिवस झाले तरी अजूनही या केंद्रांतून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी येथील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली उदंचन केंद्रातून १०० एमएलडी पाणी उचलून व शुद्धीकरण करून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहोली, उंभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी व आंबिवली येथे पुरवले जाते. परंतु, शुक्र वारी झालेल्या पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्र दोन दिवस पाण्याखाली होते. यामुळे तेथील पाणी शुद्ध व पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रसामग्री व पंपहाउस नादुरु स्त झाले आहेत. यामुळे चार दिवसांपासून टिटवाळा परिसरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी चार दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री व पंपहाउस दुरु स्त करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. परंतु, त्यांना काही यश येत नाही. एक बिघाडदुरु स्त केला की दुसरा बिघाड होत असल्याने अक्षरश: कर्मचारी व अधिकारी चार दिवसांपासून हैराण झाले आहेत.दरम्यान, चार दिवसांपासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहोत. केडीएमसी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थापक म्हणून टँकरद्वारे तरी पिण्याच्या पाणीपुरवठा करायला हवा होता. आम्ही चार दिवसांपासून विकत घेऊन पाणी पित आहोत. काही नागरिक अक्षरश: पावसाचे पाणी गाळ व गरम करून वापरत आहेत, असे टिटवाळा येथील रहिवासी नीलेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चार दिवसांपासून मी मोहिली येथील उदंचन केंद्रांवर जाऊन पाहणी करत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून पुराच्या पाण्यामुळे नादुरु स्त झालेली यंत्रसामग्री दुरु स्त करण्याचे काम करत आहेत.- उपेक्षा भोईर, उपमहापौरदोन दिवस संपूर्ण पंपहाउस, उदंचन केंद्र व जलशुद्धीकरण केंद पुराच्या पाण्यात होते. यामुळे येथील सर्व मशनरी, पंप हाउस नादुरु स्त झाली आहे. एक बिघाड दुरु स्त केला की दुसरा बिघाड पुढे उभा राहतो. लवकरच आम्ही हा बिघाड दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, ‘अ’ प्रभाग क्षेत्र

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी