शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:43 IST

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : मोहोली उदंचन केंद्रातील यंत्रणा अद्याप नादुरुस्त

टिटवाळा : कल्याण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केडीएमसीचे मोहिली उदंचन केंद्र पाणीखाली गेले होते. त्यामुळे या केंद्रांतून तसेच मोहने सबपंप हाउसमधून कल्याण-डोंबिवली शहरांना दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. रविवार सायंकाळनंतर कल्याण-डोंबिवलीचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, केडीएमसीतील भाग असलेल्या टिटवाळा शहर आणि परिसराला चार दिवस झाले तरी अजूनही या केंद्रांतून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी येथील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली उदंचन केंद्रातून १०० एमएलडी पाणी उचलून व शुद्धीकरण करून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहोली, उंभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी व आंबिवली येथे पुरवले जाते. परंतु, शुक्र वारी झालेल्या पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्र दोन दिवस पाण्याखाली होते. यामुळे तेथील पाणी शुद्ध व पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रसामग्री व पंपहाउस नादुरु स्त झाले आहेत. यामुळे चार दिवसांपासून टिटवाळा परिसरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी चार दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री व पंपहाउस दुरु स्त करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. परंतु, त्यांना काही यश येत नाही. एक बिघाडदुरु स्त केला की दुसरा बिघाड होत असल्याने अक्षरश: कर्मचारी व अधिकारी चार दिवसांपासून हैराण झाले आहेत.दरम्यान, चार दिवसांपासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहोत. केडीएमसी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थापक म्हणून टँकरद्वारे तरी पिण्याच्या पाणीपुरवठा करायला हवा होता. आम्ही चार दिवसांपासून विकत घेऊन पाणी पित आहोत. काही नागरिक अक्षरश: पावसाचे पाणी गाळ व गरम करून वापरत आहेत, असे टिटवाळा येथील रहिवासी नीलेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चार दिवसांपासून मी मोहिली येथील उदंचन केंद्रांवर जाऊन पाहणी करत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून पुराच्या पाण्यामुळे नादुरु स्त झालेली यंत्रसामग्री दुरु स्त करण्याचे काम करत आहेत.- उपेक्षा भोईर, उपमहापौरदोन दिवस संपूर्ण पंपहाउस, उदंचन केंद्र व जलशुद्धीकरण केंद पुराच्या पाण्यात होते. यामुळे येथील सर्व मशनरी, पंप हाउस नादुरु स्त झाली आहे. एक बिघाड दुरु स्त केला की दुसरा बिघाड पुढे उभा राहतो. लवकरच आम्ही हा बिघाड दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, ‘अ’ प्रभाग क्षेत्र

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी