शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:43 IST

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : मोहोली उदंचन केंद्रातील यंत्रणा अद्याप नादुरुस्त

टिटवाळा : कल्याण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केडीएमसीचे मोहिली उदंचन केंद्र पाणीखाली गेले होते. त्यामुळे या केंद्रांतून तसेच मोहने सबपंप हाउसमधून कल्याण-डोंबिवली शहरांना दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. रविवार सायंकाळनंतर कल्याण-डोंबिवलीचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, केडीएमसीतील भाग असलेल्या टिटवाळा शहर आणि परिसराला चार दिवस झाले तरी अजूनही या केंद्रांतून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी येथील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली उदंचन केंद्रातून १०० एमएलडी पाणी उचलून व शुद्धीकरण करून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहोली, उंभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी व आंबिवली येथे पुरवले जाते. परंतु, शुक्र वारी झालेल्या पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्र दोन दिवस पाण्याखाली होते. यामुळे तेथील पाणी शुद्ध व पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रसामग्री व पंपहाउस नादुरु स्त झाले आहेत. यामुळे चार दिवसांपासून टिटवाळा परिसरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी चार दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री व पंपहाउस दुरु स्त करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. परंतु, त्यांना काही यश येत नाही. एक बिघाडदुरु स्त केला की दुसरा बिघाड होत असल्याने अक्षरश: कर्मचारी व अधिकारी चार दिवसांपासून हैराण झाले आहेत.दरम्यान, चार दिवसांपासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहोत. केडीएमसी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थापक म्हणून टँकरद्वारे तरी पिण्याच्या पाणीपुरवठा करायला हवा होता. आम्ही चार दिवसांपासून विकत घेऊन पाणी पित आहोत. काही नागरिक अक्षरश: पावसाचे पाणी गाळ व गरम करून वापरत आहेत, असे टिटवाळा येथील रहिवासी नीलेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चार दिवसांपासून मी मोहिली येथील उदंचन केंद्रांवर जाऊन पाहणी करत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून पुराच्या पाण्यामुळे नादुरु स्त झालेली यंत्रसामग्री दुरु स्त करण्याचे काम करत आहेत.- उपेक्षा भोईर, उपमहापौरदोन दिवस संपूर्ण पंपहाउस, उदंचन केंद्र व जलशुद्धीकरण केंद पुराच्या पाण्यात होते. यामुळे येथील सर्व मशनरी, पंप हाउस नादुरु स्त झाली आहे. एक बिघाड दुरु स्त केला की दुसरा बिघाड पुढे उभा राहतो. लवकरच आम्ही हा बिघाड दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, ‘अ’ प्रभाग क्षेत्र

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी